शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

शासनाच्या योजना गरिबांच्या सक्षमीकरणासाठी

By admin | Updated: August 27, 2016 00:35 IST

सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र व राज्य सरकार गरिबांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक लोकाभिमूख योजना राबवित आहे.

चंदनसिंह चंदेल: बल्लारपुरात पार पडले शिबिरबल्लारपूर: सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र व राज्य सरकार गरिबांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक लोकाभिमूख योजना राबवित आहे. यातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनस्तरावरुन केला जात आहे. समाजातील दुर्बल घटकांचे शासनाच्या योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी फायदेशीर ठरणारे आहे, असे प्रतिपादन वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.येथील संत गाडगेबाबा वाचनालयात संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेच्या वतीने स्थानिक सुभाष वॉर्डात सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची माहिती देण्याच्या अनुषंगाने बुधवारी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष रेणुका दुधे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर, भाजपाच्या नगरसेवक वर्षा सुंचूवार, वैशाली जोशी, संत गाडगेबाबा महाराज जनसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, राकेश यादव यांची उपस्थिती होती.तहसीलदार विकास अहीर मार्गदर्शन करताना म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून शासन सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. यातील संजय गांधी निराधार योजना विधवा, अपंग, दुर्धर आजाराने पीडितासाठी अन्य वंचित घटकांना आर्थिक मदत मिळून आत्मनिर्भर करण्यासाठी राबविली जाते. कुटुंब अर्थ सहाय्य योजनेच्या माध्यमातून बिपीएल प्रमाणपत्र धारक विधवांना मदत दिली जाते. सदर शिबिर लाभार्थ्यांना फायद्यासाठी असून वंचितांना यातून लाभ मिळण्यास सुलभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन श्रीनिवास सुंचूवार यांनी तर आभार राकेश यादव यांनी मानले. प्रदीप पाठक, सुरज बहुरिया, रामजन्म चक्रवर्ती, योगेश शेट्टी, दीपक वर्मा, प्रमोद शाहू, श्रीकांत इटनकर, शितल निषाद, आशा निषाद, अजय मंगरुळकर यांनी शिबिराला सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)