शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

शासनाच्या योजना गरिबांच्या सक्षमीकरणासाठी

By admin | Updated: August 27, 2016 00:35 IST

सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र व राज्य सरकार गरिबांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक लोकाभिमूख योजना राबवित आहे.

चंदनसिंह चंदेल: बल्लारपुरात पार पडले शिबिरबल्लारपूर: सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र व राज्य सरकार गरिबांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक लोकाभिमूख योजना राबवित आहे. यातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनस्तरावरुन केला जात आहे. समाजातील दुर्बल घटकांचे शासनाच्या योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी फायदेशीर ठरणारे आहे, असे प्रतिपादन वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.येथील संत गाडगेबाबा वाचनालयात संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेच्या वतीने स्थानिक सुभाष वॉर्डात सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची माहिती देण्याच्या अनुषंगाने बुधवारी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष रेणुका दुधे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर, भाजपाच्या नगरसेवक वर्षा सुंचूवार, वैशाली जोशी, संत गाडगेबाबा महाराज जनसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, राकेश यादव यांची उपस्थिती होती.तहसीलदार विकास अहीर मार्गदर्शन करताना म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून शासन सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. यातील संजय गांधी निराधार योजना विधवा, अपंग, दुर्धर आजाराने पीडितासाठी अन्य वंचित घटकांना आर्थिक मदत मिळून आत्मनिर्भर करण्यासाठी राबविली जाते. कुटुंब अर्थ सहाय्य योजनेच्या माध्यमातून बिपीएल प्रमाणपत्र धारक विधवांना मदत दिली जाते. सदर शिबिर लाभार्थ्यांना फायद्यासाठी असून वंचितांना यातून लाभ मिळण्यास सुलभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन श्रीनिवास सुंचूवार यांनी तर आभार राकेश यादव यांनी मानले. प्रदीप पाठक, सुरज बहुरिया, रामजन्म चक्रवर्ती, योगेश शेट्टी, दीपक वर्मा, प्रमोद शाहू, श्रीकांत इटनकर, शितल निषाद, आशा निषाद, अजय मंगरुळकर यांनी शिबिराला सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)