शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

शासनाकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शाळा कर्मचाऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:52 IST

सास्ती : आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अनुदानित माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर असूनही शासनाने मागील चार महिन्यापासून पुरेसा वेतन निधी वितरित ...

सास्ती : आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अनुदानित माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर असूनही शासनाने मागील चार महिन्यापासून पुरेसा वेतन निधी वितरित न केल्यामुळे येथील कर्मचारी वेतनापासून वंचित असून आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. मात्र शासनाने इतर माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी वितरित करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे शासन आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शाळांच्या कर्मचाऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

आदिवासी क्षेत्रात असलेल्या माध्यमिक शाळांचा दर्जा सुधारावा. माध्यमिक शिक्षणाचा समतोल विकास साधता यावा. विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या माध्यमिक शाळांना अनुदान मिळणे सुलभ व्हावे, याकरिता शासनाने आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शाळा ३० मे २००८ व ११ फेब्रुवारी २००९ च्या शासन निर्णयअन्वये अनुदानास पात्र ठरवून अनुदान मंजूर केले. या सर्व शाळा शालेय शिक्षण विभागाच्या असल्या तरी या शाळांतील कर्मचाऱ्यांना मात्र वेतन निधी आदिवासी विकास विभाग व शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त होत असतो. या मुळे राज्यातील इतर शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत असले तरी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शाळांच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात आदिवासी उपयोजना क्षेत्रातील केवळ पाच शाळा व काही तुकड्या असून या शाळांना शासनाकडून चार महिन्यांपासून वेतन निधी प्राप्त झाला नाही, तर झालेला निधी अत्यल्प असल्यामुळे या शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतन होऊ शकले नाही. शालेय शिक्षण विभागाच्या परंतु आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शाळा या लेखाशिर्ष १९०१ मधून वेतन घेतात तर इतर शाळा लेखाशिर्ष ४४२ मधून वेतन घेतात. ४४२ चा निधी नियमित येतो. परंतु १९०१ चा निधी वेळेत तर येत नाही आणि आला तर अत्यल्प येत असल्याने वेळेत वेतन होत नाही.

काेट

शाळांना वेतनेतर अनुदानही दिल्या जात नसल्याने विकासात्मक कामे रखडली आहेत. एकाच विभागाच्या शाळातील दुजाभाव दूर करून या शाळा प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा केला गेला. परंतु, याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्या गेले आहे. आता आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल की काय असा सूर कर्मचाच्यामधून निघत आहे.

- मोरेश्वर थिपे, मुख्याध्यापक, प्रियदर्शिनी विद्यालय, साखरी.