शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या आर्थिक उत्थानासाठी सरकार कटीबद्ध

By admin | Updated: August 22, 2016 01:54 IST

विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून जनतेची आर्थिक संपन्नता साध्य आणि त्यांचा आर्थिक उत्थान

हंसराज अहीर : ‘स्वातंत्र्याची ७० वर्ष; शहिदांचे स्मरण’ कार्यक्रमभद्रावती : विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून जनतेची आर्थिक संपन्नता साध्य आणि त्यांचा आर्थिक उत्थान करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असून जनतेनेसुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे आयोजित ‘स्वातंत्र्याची ७० वर्ष - शहीदांचे स्मरण’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.सांसद आदर्श ग्राम असलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने कर्मवीर विद्यालयात आयोजित ‘स्वातंत्र्याची ७० वर्ष - शहीदांचे स्मरण’ या विशेष कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, माजी आमदर संजय देवतळे, भद्रावती पंचायत समितीच्या सभापती इंदु नन्नावरे, क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूरचे क्षेत्रीच प्रचार अधिकारी मनोज सोनोने, चंदनखेडाच्या सरपंच गायत्री डेविस बागेसरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, शेतकऱ्यांना केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतीला पुरक असलेल्या जोडधंद्यांकडे वळण्याची गरज असून मुद्रा योजनेअंतर्गत रेशिम उद्योग, मधमाशी पालन, दुध डेरी यासारख्या पुरक व्यवसायाचा स्वीकार केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा आत्मविश्वास अहीर यांनी व्यक्त केला.बँकांनी मागेल त्याला कर्ज देण्याचे प्रयत्न करावे, असे सांगून ना. हंसराज अहीर म्हणाले की, सरकार विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु सरकारच्या सोबतच आर्थिक उत्थानाची जबाबदारी लोकांचीसुद्धा असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी बँक आॅफ महाराष्ट्राच्या चोरा शाखेच्या वतीने गजानन ठाकरे या लाभार्थ्यास पुनर्गठीत पीक कर्ज या योजनेतून अडीच लाख तसेच दिनेश निमजे यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून नव्वद हजाराचे अर्थ साहित्याचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह हे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, स्वातंत्रविरांच्या बलिदानातून आपणास स्वतंत्र प्राप्त झाले. छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेवून एक आदर्श ग्राम बनविण्याचा संकल्प याप्रसंगी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी माजी मंत्री संजय देवतळे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यांनी केले.यावेळी बँक आॅफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक संजय हिरेमठ यांनी मुद्रा योजना, अटल पेंशन योजना याची उपस्थितांना माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी बी.सी. राजवाडे यांनी पीक विमा योजना, चंद्रपूर येथील आयटीआयचे प्राचार्य नितीन जुनोनकर यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.व्ही. मुंजनकर यांनी आरोग्याच्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूरचे क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे बी.पी. रामटेके, आर.एम. सोनसळ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)