शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शासन बदलले मात्र शेतमालाचे भाव तेच

By admin | Updated: December 29, 2014 01:08 IST

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. नव्या शासनाकडून शेतकऱ्यांना भाववाढीची भेट मिळेल, अशी आशा होती.

नांदाफाटा : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. नव्या शासनाकडून शेतकऱ्यांना भाववाढीची भेट मिळेल, अशी आशा होती. मात्र शेतमालाच्या किमती गेल्या वर्षीप्रमाणेच स्थिर असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. गेल्यावर्षी कापसाचा हमीभाव ४ हजार रुपये, सोयाबीन २ हजार ५६० रुपये, धान १ हजार ३०० ते १ हजारर ४५० रुपये याप्रमाणे होता. यावर्षी कापसाला ४ हजार ५०, सोयाबीन आणि धान मात्र जैसे थे आहे. केवळ कापसासाठी ५० रुपयांची भाववाढ करुन शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडला पाने पुसली आहे. विदर्भात कापूस, सोयाबीन आणि धानाचे मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून उत्पादन घेतले जाते. यातच गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि आता कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याचाच परिणाम विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. निवडणुकीपूर्वी विरोधी बाकावर बसून कापसाला ६ हजार रुपये, धानाला ३ हजार रुपये तर सोयाबीनला ५ हजार रुपये भाव मागणारे सध्याचे मुख्यमंत्री सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कसे विचारले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.कापसाचा उत्पादन खर्च साधारणत: ६ हजार ८०० ते ७ हजारांपर्यंत आहेत. यातच महागडे बियाणे आणि किटकनाशकांमुळे सोयाबीन आणि धानाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या या हमीभावात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरुन निघणे कठिण झाले आहे. यावर्षी कोरडा दुष्काळ असल्याने उत्पादनाची टक्केवारी कमालीची घसरली आहे. तर दुसरीकडे सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस साचलेला असून भाव नसल्याने नाराजी पसरली आहे. वाढत्या मजुरांचा खर्च आणि शेतीसाहित्याचा विचार केल्यास आता शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना उधारवाडी करुन कुटुंब चालवावे लागत आहे. काही ठिकाणी मुलींचे लग्न आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्चही पेलवणारा नाही. शासनाने परीक्षा शुल्क माफ केले असले तरी पोटाला लागणारे अन्न आणि मुलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या, हा प्रश्न आजही कायमच आहे. (वार्ताहर)