शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शासन बदलले मात्र शेतमालाचे भाव तेच

By admin | Updated: December 29, 2014 01:08 IST

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. नव्या शासनाकडून शेतकऱ्यांना भाववाढीची भेट मिळेल, अशी आशा होती.

नांदाफाटा : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. नव्या शासनाकडून शेतकऱ्यांना भाववाढीची भेट मिळेल, अशी आशा होती. मात्र शेतमालाच्या किमती गेल्या वर्षीप्रमाणेच स्थिर असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. गेल्यावर्षी कापसाचा हमीभाव ४ हजार रुपये, सोयाबीन २ हजार ५६० रुपये, धान १ हजार ३०० ते १ हजारर ४५० रुपये याप्रमाणे होता. यावर्षी कापसाला ४ हजार ५०, सोयाबीन आणि धान मात्र जैसे थे आहे. केवळ कापसासाठी ५० रुपयांची भाववाढ करुन शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडला पाने पुसली आहे. विदर्भात कापूस, सोयाबीन आणि धानाचे मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून उत्पादन घेतले जाते. यातच गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि आता कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याचाच परिणाम विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. निवडणुकीपूर्वी विरोधी बाकावर बसून कापसाला ६ हजार रुपये, धानाला ३ हजार रुपये तर सोयाबीनला ५ हजार रुपये भाव मागणारे सध्याचे मुख्यमंत्री सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कसे विचारले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.कापसाचा उत्पादन खर्च साधारणत: ६ हजार ८०० ते ७ हजारांपर्यंत आहेत. यातच महागडे बियाणे आणि किटकनाशकांमुळे सोयाबीन आणि धानाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या या हमीभावात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरुन निघणे कठिण झाले आहे. यावर्षी कोरडा दुष्काळ असल्याने उत्पादनाची टक्केवारी कमालीची घसरली आहे. तर दुसरीकडे सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस साचलेला असून भाव नसल्याने नाराजी पसरली आहे. वाढत्या मजुरांचा खर्च आणि शेतीसाहित्याचा विचार केल्यास आता शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना उधारवाडी करुन कुटुंब चालवावे लागत आहे. काही ठिकाणी मुलींचे लग्न आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्चही पेलवणारा नाही. शासनाने परीक्षा शुल्क माफ केले असले तरी पोटाला लागणारे अन्न आणि मुलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या, हा प्रश्न आजही कायमच आहे. (वार्ताहर)