शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शासन प्रशासनाने इरई नदीला जिवंत केले

By admin | Updated: May 9, 2016 00:54 IST

नदी व समाजाचे अतुट नाते असून मृतावस्थेत गेलेल्या इरई नदीला शासन व प्रशासनाने जिवंत करण्याचे अभिनंदनीय काम केले आहे.

राजेंद्रसिंग यांचे मनोगत : रिव्हर आणि सिव्हर वेगळे ठेवाचंद्रपूर : नदी व समाजाचे अतुट नाते असून मृतावस्थेत गेलेल्या इरई नदीला शासन व प्रशासनाने जिवंत करण्याचे अभिनंदनीय काम केले आहे. कारखान्याची राख व ओव्हर बर्डनमुळे लुप्त पावलेली इरई नव्याने पुनर्जन्म घेत आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे प्रसिध्द जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंग यांनी सांगितले. शनिवारी पडोली, दाताळा व चौराळा या ठिकाणी प्रशासनाने सुरु केलेल्या इरई पुनरुज्जीवन कार्यक्रमाची प्रत्यक्ष पाहणी डॉ. राजेंद्रसिंग यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, तहसीलदार संतोष खांडरे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी हजर होते.दुर्गापूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील राख व ओव्हर बर्डनमुळे इरईचा मूळ प्रवाह बदलला होता. यामुळे इरईचे मुळ रुप नष्ट होण्याच्या मार्गावर असतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन राबविलेला इरई पुनरुज्जीवन कार्यक्रम कौतुकास पात्र असल्याचे राजेंद्र्रसिंग यांनी सांगितले.इरईचे सुरु असलेले काम पाहून राजेंद्रसिंग यांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनातर्फे सुरु असलेले काम योग्य दिशेने व इरई पुनरुज्जीवन होण्याच्या अनुषंगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. नदी आपल्या पूर्वीच्या प्रवाहाप्रमाणे वाहू शकेल, याचे या कार्यक्रमात भान ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नदीच्या आरोग्याची दक्षता घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. रेती हे नदीचे आरोग्य असते असे नमूद करुन राजेंद्रसिंग म्हणाले की, खोलीकरणाचे काम रेती लागेपर्यंतच करण्यात आले ही बाब अतिशय चांगली आहे. कारण रेती नदीतील पाण्याला शुध्द करत असते याबाबीचे प्रशासनाने खास लक्ष ठेवल्याचे त्यांनी सांगितले. इरई पुनरुज्जीवित करीत असताना खोलीकरणाचा स्तर रेतीच्या स्तरापर्यंतच आणावा व नदीमध्ये डोह तयार होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. (प्रतिनिधी)