शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्दचे काम ३२ वर्षांनंतरही अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST

नागभीड : ३२ वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाच्या धरणाचे काम झाले असले तरी या प्रकल्पाच्या ...

नागभीड : ३२ वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाच्या धरणाचे काम झाले असले तरी या प्रकल्पाच्या कालव्यांचे आणि वितरिकांचे काम अपूर्णच आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुके सिंचनापासून वंचितच आहेत.

आता मुख्यमंत्रीच या कामाची पाहणी करण्यासाठी नागभीड तालुक्यात येत असल्याने उर्वरित काम जलदगतीने पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांच्या प्रयत्नाने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी २२ एप्रिल १९८८ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. भूमिपूजनानंतरच्या या ३० वर्षांत मुख्य प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण अशा ४२ कि.मी. लांबीच्या डाव्या आणि ११० कि.मी. लांबीच्या उजव्या कालव्यांचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यताही देण्यात आली. पण, प्रकल्पाला गती येण्याऐवजी दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. या कालव्यांचे उपकालवे आणि पाणी वितरिकांच्या कामाला अद्याप सुरुवातच करण्यात न आल्याने या प्रकल्पाचे शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास आणखी किती दिवस लागतात, याचा कोणताच पत्ता नाही.

धरणाचे आणि उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाल्याने तीन वर्षांपूर्वी उजव्या कालव्याच्या माध्यमातून धरणाचे पाणी आसोला मेंढा तलावात सोडण्यात आले. आसोला मेंढा तलावाच्या ज्या काही जुन्या वितरिका आहेत, त्याद्वारे सावली तालुक्यात सिंचन उपलब्ध होत असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य तालुके मात्र सिंचनापासून गेल्या ३० वर्षांत वंचितच आहेत, हेही एक वास्तवच आहे. या प्रकल्पात समावेश असलेल्या नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर या व अन्य तालुक्यांत भाताची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. नव्हे याच पिकावर या तालुक्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. गोसेखुर्द धरणाच्या निमित्ताने या तालुक्यांना मोठी आशा निर्माण झाली होती. पण, शासन या प्रकल्पाबाबत जे चालढकल धोरण अवलंबत आहे, त्यावरून या तालुक्यांच्या आशा पार मावळून गेल्या आहेत.

उजव्या कालव्याचा उपकालवा असलेला घोडाझरी या उपकालव्याची अवस्था फार बिकट आहे.

बॉक्स

उपकालव्याचे कामही रखडले

दहा-बारा वर्षांपूर्वी या उपकालव्याचे काम सुरू करण्यात आले. काही वर्ष या उपकाल्याचे काम जोरात करण्यात आले. मात्र, नंतर बांधकाम कंपन्यांची देयके थकत गेल्याने या कंपन्यांनी कामच करणे बंद केले. नंतर तर या कंपन्यांची कंत्राटे रद्द करण्यात आली. तेव्हापासून या उपकालव्याच्या कामाला जी खीळ बसली, ती खीळ अद्यापही कायम आहे. आता या उपकालव्याचे जे काम झाले आहे ते पूर्णतः खंड खंड स्वरूपात असून, या उपकालव्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

बाॅक्स

मातीचे डोंगर व मृत्यूचे घाट

या उपकालव्यातून मोठ्या प्रमाणावर मातीचा उपसा करण्यात आला आहे. या मातीची इतरत्र विल्हेवाट न लावता कालव्यानजीकच्या शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून तिथेच ठेवण्यात आली. या मातीचे मोठे-मोठे डोंगर तयार झाली आहेत. परिणामी शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. एवढेच नाही, तर या उपकालव्यात आजपर्यंत अनेकांचा बळीही गेला आहे. नागभीड तालुक्यापुरते बोलावयाचे झाल्यास या चार पाच वर्षांत सात लोकांचा बळी या उपकालव्याने घेतला आहे.