शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST

कोरोना काळात स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आता सर्वांनीच हा विषय ...

कोरोना काळात स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आता सर्वांनीच हा विषय गांभीर्याने घेतल्याचे दिसते. युवक-युवती, विद्यार्थ्यांमध्येही जागृती वाढली. आरोग्य उत्तम असेल तर विविध क्षेत्रांत करिअर करण्यास मोठी मदत होऊ शकते.

-पुष्पकांत बोरकर जीम बाईज्, चंद्रपूर

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार व व्यायामही केला पाहिजे. कोरोना काळ हा सर्वांसाठी धक्कादायक आहे. बालकांपासून तर वृद्धांची काळजी हा गंभीरतेचा विषय आहे. कोरोनामुळे आहारबाबत जागृती वाढली. हा संपूर्ण कुटुंब व आयुष्याचाच भाग झाला पाहिजे.

-डॉ. गोपाल मुंदडा, बालरोग व आहारतज्ज्ञ, चंद्रपूर

कोरोनामुळे साराच समुदाय अस्वस्थतेत आहे. आपण वेळीच खबरदारी घेतली नाही तर अनेक संकटे निर्माण होतील. समस्या आहेत; पण त्या सोडविण्यासाठी मनाचे आरोग्य उत्तम राखणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिग हा पर्याय आहे. यातून आपण अनेक समस्यांवर मात करू शकतो.

-डॉ. विवेक बांबोळे, मानसिक रोगतज्ज्ञ, चंद्रपूर

समाज माध्यमांवर खोट्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. त्यामुळे अफवा व खोटी माहिती पसरविणाऱ्या ग्रुपमधून बाहेर पडावे, खात्री केल्याशिवाय पोस्ट फॉरवर्ड करू नये, ही नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे.

-मुजावर अली, पोलीस उपनिरीक्षक, सायबर क्राइम, चंद्रपूर

कोरोना संसर्गापासून कामाची पद्धत बदलली. आपले कर्तव्य पूर्ण करताना स्वत:चे व इतरांच्याही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, याच भान आले. संकट असताना विहित कालावधीत कामे कशी पूर्ण करायची, याचाही अनुभव आला. कोरोनामुळे नवीन वर्क कल्चर तयार झाले.

-दीपक जेऊरकर, अध्यक्ष राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूर