शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

सर्वंकष विकासासाठी सुशासन अत्यावश्यक

By admin | Updated: January 1, 2016 01:51 IST

देशाच्या संविधानाशी अभिप्रेत असलेली लोकशाही समृद्ध मानली गेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाचे

चंद्रपूर : देशाच्या संविधानाशी अभिप्रेत असलेली लोकशाही समृद्ध मानली गेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाचे कार्य प्रभावीपणे चालल्यास किंबहूना शासन व प्रशासनाच्या कार्यास लोकाभिमुखतेची जोड दिल्यास खऱ्या अर्थाने सुशासनाची प्रतिष्ठापणा होऊ शकते व हे कार्य राष्ट्रस्तरीय ठरल्यास देशाच्या सर्वकष विकासाचा वेग अधिक गतिमान व प्रशस्त होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसापासून प्रारंभ झालेल्या राष्ट्रीय सुशासन दिन सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित नागरिकांशी संवाद या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.स्थानिय प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आ. नाना शामकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी मंत्री संजय देवतळे, आ. संजय धोटे, वणीचे आमदार संजीव रेड्डी, बोदरकुरवार, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, रमेश बागला, प्रमोद कडू, उपमहापौर वसंत देशमुख, महिला नेत्या वनिता कानडे, डॉ. एम. जे. खान, देवराव भोंगळे, हरिश शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, उपजिल्हाधिकारी संजय धिवरे, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, संजय दैने, अनिल फुलझेले, अंजली घोटेकर, नामदेव डाहूले आदींची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संयुक्त संचालन अंजली घोटेकर, नासिर खान यांनी केले.कार्यक्रमाला चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, मूल, वणी आदी तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, भाजपाचे व अन्य पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून या राष्ट्रीय सुशासन दिन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. (प्रतिनिधी)