शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

सर्वंकष विकासासाठी सुशासन अत्यावश्यक

By admin | Updated: January 1, 2016 01:51 IST

देशाच्या संविधानाशी अभिप्रेत असलेली लोकशाही समृद्ध मानली गेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाचे

चंद्रपूर : देशाच्या संविधानाशी अभिप्रेत असलेली लोकशाही समृद्ध मानली गेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाचे कार्य प्रभावीपणे चालल्यास किंबहूना शासन व प्रशासनाच्या कार्यास लोकाभिमुखतेची जोड दिल्यास खऱ्या अर्थाने सुशासनाची प्रतिष्ठापणा होऊ शकते व हे कार्य राष्ट्रस्तरीय ठरल्यास देशाच्या सर्वकष विकासाचा वेग अधिक गतिमान व प्रशस्त होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसापासून प्रारंभ झालेल्या राष्ट्रीय सुशासन दिन सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित नागरिकांशी संवाद या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.स्थानिय प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आ. नाना शामकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी मंत्री संजय देवतळे, आ. संजय धोटे, वणीचे आमदार संजीव रेड्डी, बोदरकुरवार, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, रमेश बागला, प्रमोद कडू, उपमहापौर वसंत देशमुख, महिला नेत्या वनिता कानडे, डॉ. एम. जे. खान, देवराव भोंगळे, हरिश शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, उपजिल्हाधिकारी संजय धिवरे, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, संजय दैने, अनिल फुलझेले, अंजली घोटेकर, नामदेव डाहूले आदींची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संयुक्त संचालन अंजली घोटेकर, नासिर खान यांनी केले.कार्यक्रमाला चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, मूल, वणी आदी तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, भाजपाचे व अन्य पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून या राष्ट्रीय सुशासन दिन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. (प्रतिनिधी)