शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

संगमेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:33 IST

पदव्युत्तर महाविद्यालयाचा अभाव चंद्रपूर : जिल्ह्यात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वरोरा शहरात एकही पदव्युत्तर महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना भद्रावती ...

पदव्युत्तर महाविद्यालयाचा अभाव

चंद्रपूर : जिल्ह्यात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वरोरा शहरात एकही पदव्युत्तर महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना भद्रावती किंवा चंद्रपूर येथे जाऊन आपले पुढील शिक्षण पूर्ण करावे लागते.

बसस्थानक नसल्याने गैरसोय

चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती, कोरपना, पोंभूर्णा, गडचांदूर, भिसी, माजरी, नवरगाव, दुर्गापूर, विसापूर, कोठारी या महत्त्वपूर्ण ठिकाणी सुसज्ज बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रेल्वेमार्गाची नागरिकांची मागणी

मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वेमार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामीण भागात जनजागृती करावी

चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये शासनाने वैयक्तिक शौचालय बांधून दिले आहे. असे असतानाही आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही नागरिक शौचालयाचा वापर न करताच बाहेर जात आहे. त्यामुळे जनजागृती करणे गरजेचे आहे.

कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या

चंद्रपूर : ऑनलाइन वेतन देयक तयार करण्यासाठी इंटरनेटसह संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक, तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.

जिल्ह्यात वाढीव टाकीचा अभाव

वरोरा : शहराचा विस्तार वाढत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी एका पाणी टाकीचे बांधकाम करण्याची गरज आहे. नगरपंचायतीने याबाबत हालचाली कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वरोरा शहरातील काही वॉर्डांना अतिशय कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय अनेक नागरिक नळाला टिल्लूपंप लावत असल्याने काही भागांतील लोकांना अपुरे पाणी मिळत आहे.

बंद पथदिव्यांमुळे गैरसोय

चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ, कृष्णनगर, पठाणपुरा वॉर्डातील काही पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नळयोजनांना तांत्रिक अडचणींचे ग्रहण

ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नाही.

पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका

कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने, जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला, परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे.