शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

संगमेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:33 IST

पदव्युत्तर महाविद्यालयाचा अभाव चंद्रपूर : जिल्ह्यात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वरोरा शहरात एकही पदव्युत्तर महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना भद्रावती ...

पदव्युत्तर महाविद्यालयाचा अभाव

चंद्रपूर : जिल्ह्यात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वरोरा शहरात एकही पदव्युत्तर महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना भद्रावती किंवा चंद्रपूर येथे जाऊन आपले पुढील शिक्षण पूर्ण करावे लागते.

बसस्थानक नसल्याने गैरसोय

चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती, कोरपना, पोंभूर्णा, गडचांदूर, भिसी, माजरी, नवरगाव, दुर्गापूर, विसापूर, कोठारी या महत्त्वपूर्ण ठिकाणी सुसज्ज बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रेल्वेमार्गाची नागरिकांची मागणी

मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वेमार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामीण भागात जनजागृती करावी

चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये शासनाने वैयक्तिक शौचालय बांधून दिले आहे. असे असतानाही आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही नागरिक शौचालयाचा वापर न करताच बाहेर जात आहे. त्यामुळे जनजागृती करणे गरजेचे आहे.

कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या

चंद्रपूर : ऑनलाइन वेतन देयक तयार करण्यासाठी इंटरनेटसह संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक, तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.

जिल्ह्यात वाढीव टाकीचा अभाव

वरोरा : शहराचा विस्तार वाढत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी एका पाणी टाकीचे बांधकाम करण्याची गरज आहे. नगरपंचायतीने याबाबत हालचाली कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वरोरा शहरातील काही वॉर्डांना अतिशय कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय अनेक नागरिक नळाला टिल्लूपंप लावत असल्याने काही भागांतील लोकांना अपुरे पाणी मिळत आहे.

बंद पथदिव्यांमुळे गैरसोय

चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ, कृष्णनगर, पठाणपुरा वॉर्डातील काही पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नळयोजनांना तांत्रिक अडचणींचे ग्रहण

ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नाही.

पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका

कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने, जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला, परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे.