शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

२२ दिवसानंतरही मुलींचा शोध नाही

By admin | Updated: December 25, 2014 23:30 IST

औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातून ३ डिसेंबर रोजी दोन मुली बेपत्ता झाल्या. २२ दिवसानंतरही या मुलींचा शोध घेण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहेत.

नांदाफाटा : औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातून ३ डिसेंबर रोजी दोन मुली बेपत्ता झाल्या. २२ दिवसानंतरही या मुलींचा शोध घेण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहेत.३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता गोवऱ्या वेचणीसाठी घराबाहेर पडलेल्या मुली सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली. त्यांनतर मुलीच्या आई- वडिलांनी दूरध्वनीवरुन नातेवाईकांना संपर्क केला. तसेच परिसरात शोध घेतला. मात्र दोन्ही मुलींचा पत्ता न लागल्याने शेवटी मुलींच्या आईवडिलांनी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर तात्काळ गडचांदूरचे ठाणेदार वंजारी यांनी पोलीस पथक सोबत घेऊन मुलींचा शोध घेणे सुरू केले. मात्र तब्बल २२ दिवस उलटूनही मुलींचा पत्ता न लागल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही मुली अल्पवयीन असून अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. यातील एक मुलगी गडचांदूर येथील झी- सेल या दुकानात काही महिने कामावर असल्याचेही समजते. घरी गॅस सिलिंडर नसल्याने गोवऱ्या गोळा करून आणाव्या लागतात. घटनेच्या दिवशी दोन्ही मुली गोवऱ्या गोळा करायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. गडचांदूरनजिक माणिकगड, अंबुजा हे दोन मोठे सिमेंट प्रकल्प आहे. त्यामुळे या परिसरात विविध राज्यातील नागरिकांचे जाणे- येणे असते. त्यामुळे मुलींचे कुणी पलायन तर केले नसेल ना, अशी शंका आहे.(वार्ताहर)