शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

वसतिगृहात प्रवेशासाठी मुलींचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 00:52 IST

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना आहेत.

जागा भरल्या : विद्यार्थिनी प्रवेशापासून वंचितचंद्रपूर: आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना आहेत. मात्र, त्या कागदावरच असतात, याची प्रचिती शनिवारी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात बघावयास मिळाली. दुर्गम भागातील विद्यार्थिनींना अद्याप वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पालकांसह सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घातला. आदिवासी समाजातील मुलींसाठी चंद्रपुरात दोन वसतिगृहे आहेत. यातील एका वसतिगृहाची ७५, तर दुसऱ्या वसतिगृहाची १२५, अशी क्षमता आहे. त्यासाठी आदिवासी समाजातील दुर्बल घटकातील मुलींना प्रवेश दिला जातो. उच्चशिक्षणासाठी चंद्रपुरात येणाऱ्या या समाजातील मुलींना याच वसतिगृहाचा आधार आहे. या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया आता आॅनलाईन करण्यात आली. यावर्षी जून महिन्यात ती पार पडली. यामध्ये अनेक मुलींनी अर्ज केला होता. मात्र, सप्टेंबर महिना लोटल्यानंतरही प्रवेशप्राप्त आणि प्रवेश नाकारलेल्या मुलींची यादी जाहीर करण्यात आली नाही. याबाबत वसतिगृहाच्या अधीक्षकाला विचारणा केली असता त्यांनी सर्व जागा भरल्याचे सांगितले. त्यामुळे या मुलींनी पालकासह सहायक प्रकल्प अधिकाऱ्याचे कार्यालय गाठले. मात्र, सर्व जागा भरल्या आहेत, असे सांगत त्यांनी या मुलींना पिटाळून लावले. त्यानंतर मुलींनी आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षांना ही हकिकत सांगितली. त्यानंतर अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. वसतिगृहाची क्षमता कमी आहे. १२५ विद्यार्थ्यांची येथे क्षमता आहे. मात्र त्यात केवळ शंभरी मुलीच राहू शकतात. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. निवड झालेल्या मुलींची सूची लावणे आवश्यक होती. ती जबाबदारी वसतिगृहाच्या अधीक्षकांची होती, असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वाहणे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)