शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

वसतिगृहात प्रवेशासाठी मुलींचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 00:52 IST

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना आहेत.

जागा भरल्या : विद्यार्थिनी प्रवेशापासून वंचितचंद्रपूर: आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना आहेत. मात्र, त्या कागदावरच असतात, याची प्रचिती शनिवारी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात बघावयास मिळाली. दुर्गम भागातील विद्यार्थिनींना अद्याप वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पालकांसह सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घातला. आदिवासी समाजातील मुलींसाठी चंद्रपुरात दोन वसतिगृहे आहेत. यातील एका वसतिगृहाची ७५, तर दुसऱ्या वसतिगृहाची १२५, अशी क्षमता आहे. त्यासाठी आदिवासी समाजातील दुर्बल घटकातील मुलींना प्रवेश दिला जातो. उच्चशिक्षणासाठी चंद्रपुरात येणाऱ्या या समाजातील मुलींना याच वसतिगृहाचा आधार आहे. या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया आता आॅनलाईन करण्यात आली. यावर्षी जून महिन्यात ती पार पडली. यामध्ये अनेक मुलींनी अर्ज केला होता. मात्र, सप्टेंबर महिना लोटल्यानंतरही प्रवेशप्राप्त आणि प्रवेश नाकारलेल्या मुलींची यादी जाहीर करण्यात आली नाही. याबाबत वसतिगृहाच्या अधीक्षकाला विचारणा केली असता त्यांनी सर्व जागा भरल्याचे सांगितले. त्यामुळे या मुलींनी पालकासह सहायक प्रकल्प अधिकाऱ्याचे कार्यालय गाठले. मात्र, सर्व जागा भरल्या आहेत, असे सांगत त्यांनी या मुलींना पिटाळून लावले. त्यानंतर मुलींनी आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षांना ही हकिकत सांगितली. त्यानंतर अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. वसतिगृहाची क्षमता कमी आहे. १२५ विद्यार्थ्यांची येथे क्षमता आहे. मात्र त्यात केवळ शंभरी मुलीच राहू शकतात. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. निवड झालेल्या मुलींची सूची लावणे आवश्यक होती. ती जबाबदारी वसतिगृहाच्या अधीक्षकांची होती, असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वाहणे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)