शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

उपचाराच्या चौकटीतून बाहेर निघून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:28 IST

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनामुळे एक सकारात्मक उर्जा निर्माण झाली असून ही ऊर्जा व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. येथे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांर्ना पुरस्कार मिळाला, त्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे.

ठळक मुद्देअभय बंग : ७ व्या व्यसनमुक्ती संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनामुळे एक सकारात्मक उर्जा निर्माण झाली असून ही ऊर्जा व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. येथे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांर्ना पुरस्कार मिळाला, त्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. यापुढेही जबाबदारीने त्यांनी व्यसनमुक्तीसाठी काम करावे. व्यसनमुक्तीसाठी केवळ उपचार या चौकटीत न राहता या चौकटीबाहेर निघून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आणि महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमाची सांगता रविवारी झाली. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, संमेलनाध्यक्ष डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, शारदा बडोले, आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड, कीर्तनकार तुषार सूर्यवंशी, नशाबंदी मंडळाच्या वर्षा विलास, समाज कल्याणचे अतिरिक्त आयुक्त खंडाते, चंद्रपूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, व्यसनमुक्तीसाठी राज्यसरकारला जी मदत करता येईल, ती यापुढेही आपण करणार असून व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी नेहमीच सरकारसोबत राहू, अशी ग्वाही डॉ. बंग यांनी दिली.‘‘व्यसनमुक्त प्रसार माध्यमे आणि साहित्यिकांची जबाबदारी’ या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, गजानन निमदेव, देवेंद्र गांवडे, श्रीपाद अपराजित, सिनेअभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, नितीन कुळकर्णी यांनी दारुमुक्ती हाच पर्याय पुढे असल्याचा सुर व्यक्त केला. दारुबंदी हा उपाय ठरू शकत नाही. दारुमुक्तीलाच प्राधान्य देणे योग्य ठरेल असा सूर त्यांनी व्यक्त केला.व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा-बडोलेसुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण करणे काळाची गरज असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. व्यसनमुक्त महाराष्टÑ घडविण्यासाठी आपणा सर्वांनी पुढे येऊन एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.१३ ठराव मंजूरयाप्रसंगी निवडणुका दारूमुक्त करणे, दारूबंदीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, गावपातळीवर सामूहिक व्यसनमुक्त गट निर्माण करणे, मतदान केंद्रांवर ब्रिथलायझर मशीन उपलब्ध करून देणे आदी महत्त्वाचे १३ ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले.