शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

चंद्रपूर जिल्ह्यातील गोधन कसायाच्या दारी

By admin | Updated: July 17, 2015 00:49 IST

दुबार पेरणीच्या संकटाने खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीपायी आता गोधनही जड वाटू लागले आहे.

छाया दुष्काळाची: सोसावी लागणार चारा टंचाईची झळसंतोष कुंडकर चंद्रपूरदुबार पेरणीच्या संकटाने खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीपायी आता गोधनही जड वाटू लागले आहे. कोरड्या दुष्काळात या गोधनाला जगवायचे कसे, अशा विवंचनेत अडकलेले शेतकरी आता या पाळीव जनावरांना मिळेल त्या किंमतीत कसायाच्या हवाली करीत आहे. जीवती, कोरपनासह महाराष्ट्र, आंध्र सीमेवरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा प्रकार सुरू आहे. गोधन विक्रीतून मिळालेल्या पैशात शेतकरी भविष्यातील काही दिवसांसाठी आर्थिक तडजोड करून ठेवत आहे. यंदा जून महिन्यातील काही दिवस वगळता, नंतर पावसाने दडी मारली. जुलै महिन्याचा पंधरवडा लोटला तरी अद्यापही पावसाचा पत्ता नाही. जून महिन्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर पुढेही पाऊस येईलच, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरण्या करून टाकल्या. मात्र नंतर पाऊस बेपत्ता झाला. आता जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली असून त्यामुळे उत्पादनातही घट होणार आहे. त्यातच आता शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. काही शेतकऱ्यांनी तशी तयारी केली आहे. मात्र हाती पैसा नसल्याने व अगोदरच डोक्यावर कर्ज असल्याने बियाणांसाठी पैसे आणायचे कुठून, या प्रश्नाने अस्वस्थ झालेले शेतकऱ्यांनी आर्थिक गरज भागविण्यासाठी गोधन विक्रीचा पर्याय निवडला आहे. कसायांकडून लूटगोहत्या बंदी झाल्याने जनावरे खरेदी करण्यासाठी व्यापारी आढेवेढे घेत आहेत. शेतकऱ्यांची गरज हेरून हे व्यापारी अतिशय कमी किंमतीत जनावरांची बोली बोलत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या व्यवहारातही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. चारा टंचाईची झळयंदा पाऊसच न आल्याने यावर्षी दुष्काळामुळे भीषण चारा टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. जून महिन्यात झालेल्या दमदार पावसाने काही प्रमाणात चाऱ्याची उगवण झाली. परंतु नंतर पावसाने दडी मारली. तापमानात कमालिची वाढ झाल्याने उगवलेला चाराही करपून गेला. छुप्या मार्गाने सुरू आहे खरेदी-विक्रीगोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर या कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे गाईंना कत्तलखान्यात पोहचविणारे कसायी हादरून गेले आहेत. त्यामुळे जनावरांची खरेदी विक्री छुप्या मार्गाने सुरू आहे.पंधरवड्यात दोन कारवायाजिल्ह्यातील गोधन मोठ्या प्रमाणावर आंध्रप्रदेशात नेले जात आहे. रात्रीच्यावेळी जनावरांना एखाद्या वाहनात कोंबून त्यांची निर्यात केली जात आहे. गेल्या पंधरवड्यात जनावरांची तस्करीच्या दोन घटना पोलिसांनी उजेडात आणल्या.