शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

आठवीतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

By admin | Updated: July 12, 2014 23:34 IST

शासनाच्या धोरणानुसार वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या वर्गांना उच्च प्राथमिक शिक्षणाचा दर्जा देऊन प्रत्येक जि.प. शाळेत आठवा वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सत्र सुरू होऊन १५ दिवसांपेक्षा जास्त

पालकांची चिंता वाढली : जिल्हा परिषदेकडे शिक्षकांची कमतरताउदय गडकरी - सावलीशासनाच्या धोरणानुसार वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या वर्गांना उच्च प्राथमिक शिक्षणाचा दर्जा देऊन प्रत्येक जि.प. शाळेत आठवा वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सत्र सुरू होऊन १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी संपला तरी अभ्यासक्रमानुसार जिल्हा परिषद शाळेकडे शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार असल्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा परिषदेने जिल्हाभरात सुमारे १५० जि.प. शाळांमध्ये आठव्या वर्गाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाजवळ ५५ शिक्षकच कार्यरत आहेत. आठव्या वर्गासाठी विज्ञान, गणीत आणि इंग्रजी या विषयाचे स्वतंत्र शिक्षक अत्यावश्यक आहेत. प्रत्येक शाळेसाठी तीन शिक्षक म्हटले तरी ४५० शिक्षकांची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु जिल्हा परिषदेकडे बी.एस.सी. गुणवत्ता प्राप्त केलेले केवळ ५५ शिक्षकच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविण्याचे शासनाचे स्वप्न अधुरेच राहणार आहे.सावली तालुक्यातील नऊ जि.प. शाळांमध्ये आठवा वर्ग सुरू झाला आहे. आणि तालुक्यात विज्ञान विषयातील पदवीधर केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. सावली तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन विद्यालये आहेत. त्यामध्येसुध्दा विज्ञान शिक्षकांचा अभाव आहे. एवढेच नव्हे तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाच बसण्यासाठी पुरेशा वर्गखोल्या नाही. त्यात भर उच्च प्राथमिक शाळेची. आठव्या वर्गाची विद्यार्थी कुठे बसणार, त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळेची व्यवस्था कशी करणार, असे अनेक समस्यांचे डोंगर आहेत. जि.प. शिक्षण विभागाच्या धोरणानुसार एका वर्गात ६९ विद्यार्थी असतील तर दोन पदवीधर शिक्षक आणि ७० विद्यार्थी असतील तर ३ पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करता येते. परंतु अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असते.