शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘सोलरपंप’ उजळणार भाग्य

By admin | Updated: September 7, 2015 01:14 IST

पाणी आहे, परंतु जिथे विविध कारणांमुळे विजच पोहचली नाही, अशा दुर्गम भागातील अल्प भूधारक शेतकऱ्यांचे भाग्य आता सोलरपंपाने उजळणार आहे.

जिल्ह्यातील १३५ शेतकऱ्यांना लाभ : पाच टक्के वाटा भरून मिळणार सौरपंपचंद्रपूर : पाणी आहे, परंतु जिथे विविध कारणांमुळे विजच पोहचली नाही, अशा दुर्गम भागातील अल्प भूधारक शेतकऱ्यांचे भाग्य आता सोलरपंपाने उजळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १३५ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असुन, या योजनेसाठी सन २०१५-१६ मध्ये इच्छूक लाभार्थ्यांची महावितरणकडून निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आधारभूत किमतीच्या केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागणार असून उर्वरित रकमेचा भाग केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, महावितरण उचलणार आहे.औष्णिक ऊर्जा निर्मिती करताना होणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा व खनिज संपत्तीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे शासनाने अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य दिले आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्र व राज्य शासन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील व दुर्गम भागातील पारंपरिक पद्धतीने कृषी जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना सोलार कृषी पंप देण्यात येणार आहे.त्यामध्ये तीन अश्वशक्ती एसी सौरपंपाची केंद्र शासनाने निश्चित केलेली आधारभूत किंमत तीन लाख २४ हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना पाच टक्के प्रमाणे भरावी लागणारी किंमत १६ हजार २०० रुपये, तीन अश्वशक्ती डीसी सौरपंपाची आधारभूत किंमत चार लाख पाच हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना पाच टक्के प्रमाणे २० हजार २५० रुपये, पाच अश्वशक्ती एसी सौरपंपाची आधारभूत किंमत ४ लाख ४० हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना पाच टक्के प्रमाणे २७ हजार रुपये, पाच अश्वशक्ती डीसी सौरपंपाची आधारभूत किंमत ६ लाख ७५ हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना पाच टक्के प्रमाणे ३३ लाख ७५० रुपये ७.५ अश्वशक्ती एसी सौरपंपाची आधारभूत किंमत ७ लाख २० हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना ५ टक्के प्र्रमाणे ३६ हजार रुपये भरायचे असून उर्वरित खर्चाचा भार केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व महावितरण उचलणार आहे. महाराष्ट्रात ९ हजार ५४० शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार असून त्यामधील चंद्रपूरला १३५ सोलारपंप संच मिळणार असून सोलारपंपाची पाच वर्षांची तर सोलार पॅनलची १० वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे. तसेच पाच वर्षांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सोलार पंप पुरविणाऱ्या एजन्सीची राहणार असून तशी हमी १०० रुपयांच्या मुद्रांकावर नोटरी करून घेण्याची जबाबदारी महावितरणची राहणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीतर्फे लाभार्थ्यांची निवड होणार आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सदस्य सचिव महावितरणचे अधीक्षक अभियंता तर सदस्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व इतर दोन असे पाच सदस्य असतील. ज्या शेतकऱ्यांना पाच एकरपेक्षा कमी जमीन असून त्या (अल्पभूधारक) शेतीमध्ये विहीर किंवा विंधन विहीर आहे. ज्यांच्याकडे वीज जोडणी नाही, वीज पोहोचणे कठीण व खर्चिक असून, वनविभागाची आडकाठी आहे. अशा इच्छूक लाभार्थ्यांनी महावितरणकडे अर्ज केल्यास समितीकडून संबंधित शेतकऱ्यांचा सर्व्हे करून पात्रता यादी तयार केली जाईल. योजनेची अंमलबजावणी महावितरण कंपनी करणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) के.एस. रामटेके यांच्याशी संपर्क साधावा किंवा तालुकास्तरीय उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग तालुका कार्यालय तथा कक्ष अभियंत्याशी जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)