शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

कंत्राटी कामगारांचे भविष्य धोक्यात

By admin | Updated: September 14, 2016 00:51 IST

जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याअभावी कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली.

वरोरा कॉग्रेस कमिटी : आयुक्तांना निवेदनचंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याअभावी कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र या कंत्राटदारांकडून या कामगारांना शासकीय नियमानूसार वेतन देण्यात येत नाही. तसेच कंत्राटदाराने मागील दहा वर्षापासून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. परिणामी या कामगाराचे भविष्य अंधारात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक शेख जेरुद्दीन यांच्या नेतृत्वात वरोरा शहर कॉग्रेसच्यावतीने कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुक्यातील रुग्णालयात अपूरे कर्मचारी असल्याने सफाई, मेस व ईतर कामांकरिता कामगार सुरक्षारक्षक, वार्डबाय यांची भरती करण्यात आली. त्या कामगारांना निविदेत मंजूर व शासनाच्या भविष्य निर्वाह निधी व ईतर निधी कपात करुन त्यांच्या पुढील भविष्याकरिता प्रशासनाकडे जमा करणे गरजेचे होते. मात्र कंत्राटदाराने मागील १० वर्षापासून कामगारांचे भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. तसेच कामगारांना शासकीय नियमानुसार २८३ प्रती दिवस वेतन देणे गरजेचे होते. मात्र कामगारांना १०० रुपये प्रती दिवस आकारना करुन तीन हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. सन २००७ मध्ये एक हजार २०० रुपये, त्यानंतर दोन हजार रुपये, सन २०१५-१६ पासून तीन हजार रुपये प्रति महिना वेतन कामगारांना दिल्या जात आहे. परंतु भविष्य निर्वाह निधी व इतर दरमहा दीड हजार कपात करुन भरणा केल्या जात नाही. अशाप्रकारे कामगारांचे शोषण केल्या जात आहे. तसेच शासन नियमांचे उल्लंघन करुन कामगारांना कमी वेतन देण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची मागणी वरोरा शहर कॉग्रेस कमेटीच्यावतीने कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)कामगार किमानवेतनापासून वंचितचंद्रपूर जिल्ह्यात किमान वेतना अधिनियमाची अंमलबजावणी पूर्णपणे निरंक आहे. कामगार विभागाची कामगिरी अत्यंत दयनीय आहे. कंत्राटी कामगारांकडून मोठ्या प्रमाणात काम करवून घेतले जाते. परंतु त्या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भ प्रहार संघटनेतर्फे सुमारे ६० ते ७० कोटींचे दावे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे किमान वेतन कायद्याची अमलबंजावणी योग्य प्रमाणात करण्याची मागणी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. हर्षलकुमार चिपळूनकर यांनी केली आहे.