शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

विसापूरच्या तीनही चिमुकल्यांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

By admin | Updated: September 6, 2014 01:43 IST

खेळण्या बाळगण्याच्या वयात तीन चिमुकल्या मुलांना शाळेत जीव गमवावा लागला. याला कारणीभूत बल्लारपूर-चंद्रपूर राज्य...

बल्लारपूर : खेळण्या बाळगण्याच्या वयात तीन चिमुकल्या मुलांना शाळेत जीव गमवावा लागला. याला कारणीभूत बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्गाचे काम करणारी एचजीआयपीएल कंपनीने केलेला १५ ते २० फुटाचा खोल खड्डा ठरला. दरम्यान शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता येथील ग्रामीण रुग्णालयात तिनही मुलांचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विसापूरकरांनी तब्बल चार तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरले. अखेर कंपनी व्यवस्थापकाने मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख २० हजार रुपये मदत जाहीर केली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तिनही चिमुकल्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील नीरज विजय वैद्य (१४), क्षितिज अशोक डोंगरे (१२) व क्रिष्णा अशोक धामने (१२) या शाळकरी मुलांचा खोल खडड्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल घडली. तिघेही एकमेकांचे जीवलग मित्र होते. ते बल्लारपूर येथील आयडीयल इंग्लिश मिडीयम शाळेचे विद्यार्थी होते. या चिमुकल्यांच्या मृत्युने गावात शोकाकूल वातावरण होते. या घटनेची माहिती होताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ व पोलीस निरीक्षक निरमणी तांडी यांनी घटनेच्या दिवशी रात्री ११.३० वाजता घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. काल तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते.शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता तीनही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र थोड्याच वेळात येथे वातावरण तापले. मृतदेह स्विकारण्यास कुटुबियांनी नकार देताच पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन दंगा नियंत्रक पथकाच्या गाड्या बोलाविण्यात आला. त्यामुळे नागरिकही संतापले. दरम्यान, प्रशासनाने नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. मात्र यालाही जमावाने दाद दिली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे व एचजीआयपीेल मनमानी धोरणामुळे मोठा खड्डा पडला. यात तिघांचाही मृत्यू झाला. याला जबाबदार रस्त्याचे काम करणारी कंपनी असल्याचा आरोप नागरिकांनी केला.त्यानंतर दुपारी २ वाजता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कुंभारे यांच्या कक्षात उपविभागीय अधिकारी संजय दैने, जिल्हा खनीकर्म अधिकारी एस. पी. आवळे, प्रभारी तहसीलदार विकास अहीर, पोलीस निरीक्षक निरमनी तांडी, एचजीआयपीएलचे संजीव शर्मा यांनी विसापूर येथील शिष्टमंडळाशी तासभर चर्चा केली. त्यावेळी विसापूरकरांनी मृत्यूला कारणीभूत असलेल्या कंपनी व्यवस्थापनाने मृतकांच्या कुटुंबाला प्रत्येकी तीन लाख रुपये आर्थिक मदतीची मागणी लावून धरली. तडजोडीतून प्रशासनाने एचजीआयपीएल कंपनीचे संजीव शर्मा यांनी प्रत्येक कुटुंबाला २ लाख २० हजार रुपये देत असल्याचे लेखी दिले.तेव्हा शिष्टमंडळाचे समाधान झाल्यावर ग्रामीण रुग्णालयातून तिनही मुलांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. अत्यंत शोकाकूल वातावरणाात क्रिष्णा धामने याची अंत्यविधी पार पडली. तर नीरज वैद्य व क्षितिज डोंगरे यांच्या पार्थिवावर विसापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साऱ्यांचे डोळे पाणावले होते. विसापूरकारंनी बंद पाडून आदरांजली वाहिली. (शहर प्रतिनिधी)