शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मूल शहर विकासाला निधी कमी पडू देणार नाही

By admin | Updated: January 9, 2016 01:24 IST

मूल शहर विकास परिषदेत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता येत्या काही दिवसात होणार असून त्यांचे नियोजन विविध ...

सुधीर मुनगंटीवार : नगर पालिका पदाधिकाऱ्यांत नियोजन नसल्याने नाराजीमूल : मूल शहर विकास परिषदेत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता येत्या काही दिवसात होणार असून त्यांचे नियोजन विविध विभागांना दिले आहे. विकासाबरोबरच बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न ‘टाटा ट्रस्ट’च्या माध्यमातून केला जाणार आहे. मूल शहराच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र पालिका पदाधिकाऱ्यात मूल शहर विकासाचे नियोजन नसल्याचा ठपका ठेवत नाराजीचा सूर राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील तसेच मूल शहरात होत असलेल्या सिमेंट रस्त्याला करोडो रुपयाचा निधी दिला आहे. मूल शहरातील सर्वच रस्ते सिमेंट क्राँक्रीटने बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. बायपास वळण रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून शहरातील वाहनाची कोंडी कमी होण्यास मदत होईल. चंद्रपूर-गडचिरोली महामार्ग राष्ट्रीय महामार्ग झाल्याने मूल शहराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरातील तलावात सौंदर्यीकरण केले जाणार असून मासेमारी व शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही. याबाबत सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर येथे असलेल्या प्रियदर्शनी सभागृहाप्रमाणे मूल शहरात स्व.मा.सा. कन्नमवार या नावाने सभागृह अस्तित्वात येणार असून यात सर्व सुविधांचा समावेश असेल. गरीब व होतकरु स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी श्याम मुखर्जी वाचनालय अस्तित्वात येणार आहे. बसस्थानकाचे नुतनीकरण केले जाणार असून अद्यावत स्वरुपाचे बसस्थानक बनणार आहे. तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत तसेच पंचायत समितीची इमारत देखील नव्या स्वरुपात दिसणार आहे. मूल शहरात ९.९७ कोटी रुपयाची विद्युत व्यवस्था साकारली जाणार असून त्यात सौंदर्यीकरण वाढणार आहे. वनविभागाच्या ६० एकर जागेत वृक्षारोपण व बगीचाची निर्मिती केली जाणार आहे. शहर विकासाबरोबरच बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’च्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न निकाली काढला जाणार आहे. यासंदर्भात अंतिम टप्प्यात काम आले असल्याचे त्यांनी सांगितले. मूल शहराच्या विकासाला चालना देऊन विविध विकास कामे गेल्या अनेक वर्षात झाले नसतील ती कामे केली जाणार आहे. यासाठी न.प. पदाधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे स्व. मा.सा. कन्नमवार सभागृह पुर्णत्वास आल्यावर त्याची देखभाल करण्याची जबाबदारी तहसील कार्यालयावर देण्यात येईल असेही ते म्हणाले. नागरिकांनी विविध विकासात्मक बाबीसाठी नाविण्यपूर्ण सुचविल्यास विकासात्मक कार्यात भर घालता येईल, असेही ना. मुनगंटीवार यांनी मत व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)