शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

निधी मिळाला १.६४ कोटी, खर्च मात्र २८ लाख

By admin | Updated: October 3, 2015 00:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या विकासाला चंदनखेड्यामध्ये अखर्चित निधीचे ग्रहण लागले आहे.

खासदारांच्या दत्तक गावाला अखर्चित निधीचा अडथळाचंदनखेड्यात करायची होती ६९ कामे : अनेक कामांसाठी निधीची तरतूदच नाहीगोपालकृष्ण मांडवकर  चंद्रपूरचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या विकासाला चंदनखेड्यामध्ये अखर्चित निधीचे ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षभरात या दत्तक गावाच्या विकासासाठी ६९ कामांकरिता १३ कोटी ४८ लाख ६४ हजार रूपयांची मंजुरी मिळाली असली तरी निधी मात्र १६४ कोटी रूपयांचाच मिळाला आहे. त्यातही फक्त २८ लाख ४५ हजार रूपयांचीच कामे या गावात आजवर झाली आहेत. निधी येऊनही तो खर्च न होण्यामागे असलेल्या उदासिन मानसिकतेमुळे या गावाचा विकास मात्र मंदावला आहे.सांसद आदर्श ग्राम योजनअंतर्गत प्रत्यक खासदारांना एक गाव दत्तक घ्यायचे होते. त्यानुसार केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा हे गाव दत्तक घेतले. या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी एकूण १९ विभाग आणि यंत्रणांकडून ६९ कामांची आखणी करण्यात आली होती. त्यातील आठ कामांसाठी तरतूद होऊनही निधी मिळालाच नाही. ६१ कामांसाठी १६४ कोटी रूपयांचा निधी मिळाला असला तरी, प्रत्यक्ष सात कामांवर छदामही खर्च झाला नाही. फक्त चार विभागांनीच काही कामांवर खर्च केला आहे. यामुळे लक्षवधीचा निधी मिळूनही तो शासनाच्या तिजोरीत तसाच पडून आहे.विशेष म्हणजे, मिळालेला निधी येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचा आहे. हा कालावधी संपायला फक्त दोन महिने उरले असतानाही मोठ्या प्रमाणावर कामे बाकी आहेत. चंदनखेडा हे गाव विकसनशिल आहे. या गावात विकासकामांची आवश्यक असतानाही यंत्रणा मात्र उदासिन आहे. वनविभाग, पशु संवर्धन विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग या विभागांना कामासाठी येथे बराच वाव असतानाही छदामही खर्च केलेला नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मिळालेल्या ३ लाख ७५ हजार रूपयांपैकी ३ लाख २५ हजार रूपयांचा निधी कामांवर खर्च केला आहे. केवळ या विभागातील जिल्हा परिषदेची आघाडी वगळली तर अन्य ठिकाणी जिल्हा परिषद माघारली आहे. या उदासिनतेमुळे सांसद आदर्श ग्राम योजनेला जिल्ह्यात खिळ बसण्याची शक्यता बळावली आहे.या विभागाच्या कामांना निधीच नाहीजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पाटबंधारे विभाग, वन विभाग, बांधकाम विभाग (जि.प.), महिला व बालकल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, समाज कल्याण विभाग, लघु सिंचन विभाग (जि.प.), निधी मिळूनही खर्च शून्यजिल्हा क्रीडा विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, विद्युत विभाग, पशु संवर्धन विभाग (जि.प.), प्राथमिक शिक्षण विभाग (जि.प.), कृषी विभाग (जि.प.), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाझालेली कामेलघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग, आरोग्य विभाग (जि.प.), मग्रारोहयो (ग्रामपंचायत स्तर), पाणी व स्वच्छता मिशन कक्षअखर्चित निधीत जिल्हा परिषदच आघाडीवरनिधी मिळूनही तो खर्च न करण्यात जिल्हा परिषदच आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, खासदारही भाजपाचे आहेत आणि जिल्हा परिषदेत सत्ताही भाजपाची आहे. असे असतानाही निधी खर्च करण्यात पदाधिकाऱ्यांना रूची का नसावी, हा चिंतनाची विषय आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग आणि लघु सिंचन विभागाने तर १७ कामे प्रस्तावित करूनही निधीच दिला नाही.  काम ढेपाळले हे खरे आहे. यासाठी यंत्रणा कामी लावली आहे. डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला निर्देश दिले आहे. या संदर्भात ३ आॅक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक ठेवली आहे.- हंसराज अहीर, केंद्रीय रसायन राज्य मंत्री