शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निधी मिळाला १.६४ कोटी, खर्च मात्र २८ लाख

By admin | Updated: October 3, 2015 00:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या विकासाला चंदनखेड्यामध्ये अखर्चित निधीचे ग्रहण लागले आहे.

खासदारांच्या दत्तक गावाला अखर्चित निधीचा अडथळाचंदनखेड्यात करायची होती ६९ कामे : अनेक कामांसाठी निधीची तरतूदच नाहीगोपालकृष्ण मांडवकर  चंद्रपूरचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या विकासाला चंदनखेड्यामध्ये अखर्चित निधीचे ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षभरात या दत्तक गावाच्या विकासासाठी ६९ कामांकरिता १३ कोटी ४८ लाख ६४ हजार रूपयांची मंजुरी मिळाली असली तरी निधी मात्र १६४ कोटी रूपयांचाच मिळाला आहे. त्यातही फक्त २८ लाख ४५ हजार रूपयांचीच कामे या गावात आजवर झाली आहेत. निधी येऊनही तो खर्च न होण्यामागे असलेल्या उदासिन मानसिकतेमुळे या गावाचा विकास मात्र मंदावला आहे.सांसद आदर्श ग्राम योजनअंतर्गत प्रत्यक खासदारांना एक गाव दत्तक घ्यायचे होते. त्यानुसार केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा हे गाव दत्तक घेतले. या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी एकूण १९ विभाग आणि यंत्रणांकडून ६९ कामांची आखणी करण्यात आली होती. त्यातील आठ कामांसाठी तरतूद होऊनही निधी मिळालाच नाही. ६१ कामांसाठी १६४ कोटी रूपयांचा निधी मिळाला असला तरी, प्रत्यक्ष सात कामांवर छदामही खर्च झाला नाही. फक्त चार विभागांनीच काही कामांवर खर्च केला आहे. यामुळे लक्षवधीचा निधी मिळूनही तो शासनाच्या तिजोरीत तसाच पडून आहे.विशेष म्हणजे, मिळालेला निधी येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचा आहे. हा कालावधी संपायला फक्त दोन महिने उरले असतानाही मोठ्या प्रमाणावर कामे बाकी आहेत. चंदनखेडा हे गाव विकसनशिल आहे. या गावात विकासकामांची आवश्यक असतानाही यंत्रणा मात्र उदासिन आहे. वनविभाग, पशु संवर्धन विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग या विभागांना कामासाठी येथे बराच वाव असतानाही छदामही खर्च केलेला नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मिळालेल्या ३ लाख ७५ हजार रूपयांपैकी ३ लाख २५ हजार रूपयांचा निधी कामांवर खर्च केला आहे. केवळ या विभागातील जिल्हा परिषदेची आघाडी वगळली तर अन्य ठिकाणी जिल्हा परिषद माघारली आहे. या उदासिनतेमुळे सांसद आदर्श ग्राम योजनेला जिल्ह्यात खिळ बसण्याची शक्यता बळावली आहे.या विभागाच्या कामांना निधीच नाहीजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पाटबंधारे विभाग, वन विभाग, बांधकाम विभाग (जि.प.), महिला व बालकल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, समाज कल्याण विभाग, लघु सिंचन विभाग (जि.प.), निधी मिळूनही खर्च शून्यजिल्हा क्रीडा विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, विद्युत विभाग, पशु संवर्धन विभाग (जि.प.), प्राथमिक शिक्षण विभाग (जि.प.), कृषी विभाग (जि.प.), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाझालेली कामेलघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग, आरोग्य विभाग (जि.प.), मग्रारोहयो (ग्रामपंचायत स्तर), पाणी व स्वच्छता मिशन कक्षअखर्चित निधीत जिल्हा परिषदच आघाडीवरनिधी मिळूनही तो खर्च न करण्यात जिल्हा परिषदच आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, खासदारही भाजपाचे आहेत आणि जिल्हा परिषदेत सत्ताही भाजपाची आहे. असे असतानाही निधी खर्च करण्यात पदाधिकाऱ्यांना रूची का नसावी, हा चिंतनाची विषय आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग आणि लघु सिंचन विभागाने तर १७ कामे प्रस्तावित करूनही निधीच दिला नाही.  काम ढेपाळले हे खरे आहे. यासाठी यंत्रणा कामी लावली आहे. डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला निर्देश दिले आहे. या संदर्भात ३ आॅक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक ठेवली आहे.- हंसराज अहीर, केंद्रीय रसायन राज्य मंत्री