शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

महानगरपालिकेच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात मोर्चा

By admin | Updated: January 23, 2015 00:29 IST

चंद्रपूर शहराच्या पूरबुडित क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना महानगरपालिकेने नोटीस बजावून घरे खाली करण्याचे निर्देश दिले आहेत.

चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या पूरबुडित क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना महानगरपालिकेने नोटीस बजावून घरे खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात नागरिकांनी आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. इरई व झरपट नदीच्या काठावर असलेल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, गोपालपुरी, ठक्कर कॉलनी, ओंकारनगर, हवेली गार्डन, इंदिरानगर, विठ्ठलमंदिर वॉर्ड, झरपट वॉर्ड, नगिनाबाग येथील सुमारे पाच हजार कुटुंबांना महानगरपालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या ठिकाणी दरवर्षी पुराचे पाणी येऊन नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. त्यामुळे नागरिकांनी एका महिन्याच्या आत घर खाली करावे व अवैध बांधकाम तोडून टाकावे, असे सदर नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी असे न केल्यास महापालिकेतर्फे कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटीसमध्ये दिला आहे. मात्र अवैध बांधकामाच्या नावावर घरे पाडण्याचा हा मनपाचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व येथील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मनपाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी व मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वात येथील आझाद बागेमधून दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात आला. शहराच्या प्रमुख मार्गाने फिरून मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय वैद्य, बी.बी. उईके, ज्योती रंगारी, डी.के. आरीकर, सिराज खान, बापू अन्सारी, विठ्ठल आडराने, जाकीर शेख, महेश बोडखे, संजय निंबाळकर, रमेश चहारे, सिराज खान, संदिप जयस्वाल, अनुभाई ईसाराईल, लतीफ अंडेवाले, संजय निंबाळकर, राज गहेरे, सत्तर हुसेन, महेश बोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ुजिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले. (शहर प्रतिनिधी)