शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

‘त्या’ हत्येप्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: December 6, 2014 01:22 IST

तेलंगाना सिमेलगत असलेल्या अमृतगुडा येथील नामदेव पांडू पेंदोर (१७) याचा शिकारीसाठी टाकलेल्या जिवंत वीज तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला.

विरूर (स्टे.) : तेलंगाना सिमेलगत असलेल्या अमृतगुडा येथील नामदेव पांडू पेंदोर (१७) याचा शिकारीसाठी टाकलेल्या जिवंत वीज तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर विरुर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील स्थिती व गुप्त माहितीच्या आधारे चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुधाकर वेट्टी, शकुनाथ रामसाव मेश्राम (२१), भोजु भीमा पेंदोर (३०), यादव सोमा पेंदोर (२०) रा. अमृतगुडा यांचा समावेश आहे.राजुरा तालुक्यातील अमृतगुडा हे गाव जंगल शेजारी असल्याने येथे जंगली प्राण्यांचा वावर असते. याचा फायदा घेत येथील नागरिकांकडून जंगली प्राण्यांचे शिकार करण्याचे प्रकार वाढले आहे. याकडे मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी २५ आॅगस्टला बडगा असल्याने पोळा आटोपून मृतक व त्यांचे सहकारी शिकार करण्याचा बेत आखला. शिकार करण्यासाठी निघाले असता नामदेव पेंदोर याला खर्ऱ्याचा व्यसन असल्याने ते काही वेळ पानटपरीवर थांबले. मात्र त्याचे सहकारी हे जंगल शेजारी असलेल्या शेतशिवारात शिकारीसाठी वीज प्रवाह सुरु केला. नामदेव पेंदोर हे काही वेळाने गेल्याने आपले सहकारी वीज प्रवाह सुरु केला असेल, अशी कल्पना त्यांना नव्हती. ते वाटेने जात असताना त्याचा जिवंत वीज तारेला स्पर्श होऊन खाली कोसळले. ते वाचवा..वाचवा... असे सहकाऱ्यांना विनंती केली. मात्र सहकाऱ्यांना असे वाटत होते की, हा जिवंत राहिला तर आमचे नाव पोलिसांना सांगणार. हे प्रकरण आमच्या अंगाशी येईल. याहेतुने त्याला जीवे मारण्याचा सहकाऱ्यांनी बेत आखला. प्रथम बरशीने त्याच्या पोटावर वार केले. तो बेशुद्ध झाल्यावर त्याला कुणीही ओळखणार नाही म्हणून त्याचे नाव असलेला हात तोडला. ज्या पायाला तारेचा स्पर्श झाला तो पायही तोडला. एवढेच नाही तर क्रृरतेचा कळस गाठुन सहकाऱ्यांनी मृतकाचा चेहरा विद्रूप केला. अंगावरचे सर्व कपडे काढुन दुरवर फेकुन दिले. अनोळखी इसमाचा रेल्वेने मृत्यू झाल्याचा देखावा करण्यासाठी त्याला रेल्वे लाईनच्या बाजुला टाकुन गावात तो मी नव्हेच म्हणून पसार झाले.नामदेव पेंदोर हा पोळा सणाला रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान बाहेर जातो म्हणून घरून निघुन गेला. मात्र घरी परत आलाच नाही. दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या नामदेवचा शोध घेण्यासाठी वडिलांनी नातेवाईकांकडे विचारणा केली. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनाही विचारपूस केली. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. दरम्यान रेल्वेने अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती विरूर पोलिसांना मिळाली. तेव्हा विरूर पोलिसांनी मर्ग दाखल करून घटनेचा पंचनामा केला. दुसऱ्या दिवशी गावात मृतदेह हा नामदेव पेंदोर यांचा असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते. तेव्हा वडील व मृतकाचा काका लक्ष्मण पेंदोर हे घटनास्थळाकडे गेले असता काही अंतरावर मृतकाचे कपडे आढळून आले. तेव्हा वडिलांनी विरूर पोलीस ठाण्यात मृतदेह हा माझा मुलाचा आहे व त्याची हत्या करण्यात आली, असा संशय व्यक्त केला. तेव्हा पोलिसांनी सुधाकर वेट्टी व परशुराम वेट्टी यांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले. मात्र तीन महिन्यानंतर विरूर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील स्थिती व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी चार आरोपींना यांना अटक करून न्यायालयात हजर केले. (वार्ताहर)