शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

चार एकराचे सोयाबीन वन्यप्राण्यांकडून फस्त

By admin | Updated: July 15, 2015 01:17 IST

वरोरा: मागील वर्षी दुष्काळ, चालू हंगामात पावसाची दीर्घ विश्रांती अशा कठीण अवस्थेत शेतकरी आपला संसार कसाबसा हाकत असताना वरोरा तालुक्यातील साखरा गावातील....

वरोरा: मागील वर्षी दुष्काळ, चालू हंगामात पावसाची दीर्घ विश्रांती अशा कठीण अवस्थेत शेतकरी आपला संसार कसाबसा हाकत असताना वरोरा तालुक्यातील साखरा गावातील शेतकऱ्यांचे चार एकरातील सोयाबिन पीक वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.वरोरा तालुक्यातील साखरा (रा.) येथील उमेश काळे नामक शेतकऱ्यांची शेती जंगलालगत आहे. यावर्षी सदर शेतकऱ्याने चार एकरात सोयाबिन पिकाची लागवड केली. हंगामापूर्वी पाऊस आल्याने सोयाबीनचे पीक जमिनीवर येवून बहरण्याची वेळ येत असताना सोयाबीन पिकात वन्यप्राण्यांनी हैदोस घातला. यात संपूर्ण चारही एकरातील सोयाबिन पीक पूर्णत: नष्ट केले. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या कुंपणाला न जुमानत वन्यप्राण्यांनी शेतापिकाची नासाडी केली. एकट्या शेतकऱ्यांने वन्यप्राण्यांना हुसकविण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ला करुन जखमी केल्याच्या घटना मध्ये दिवसागणीक वाढ होत असल्याने वन्यप्राण्यांना हाकलण्याकरिता शेतकरी धजावीत नाही. त्यामुळे जंगल सोडून वन्यप्राणी शेतातील पिकाकडे धुम ठोकीत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतकरी धास्ताविले असून वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)