विविध विषयांवर चर्चा : दोनशेहून अधिक कामगारांची उपस्थितीचंद्रपूर : येथील विनकर भवनात वनकामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला.देवराव लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. एम.पी. जयस्वाल (नागपूर) तसेच प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात राजेश पिंजरकर यांनी तत्कालिन अमेरिकन सरकारने कामगार नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला व कामगार नेते अल्बर्ट पारसन्स, आॅगस्ट स्पाईस, जॉर्ज हेंगेल, अॅडाल्प फिशर या कामगार नेत्यांना फासावर चढविले. परंतु त्यापुर्वी कोणत्याही कामगार नेत्यांनी माफी मागितली नाही. आंदोलन पुढे चालले आणि शेवटी आठ तासांचा दिवस झाला. प्रा. दहिवडे म्हणाले, काळ बदलला असला तरी कामगारांचे दिवस मात्र बदलले नाही. आजही वन कामगारांना ९० दिवस होताच कामावरुन बंद केले जाते. याचाच अर्थ सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार सामान्य कामगाराला नाही तर तो वन अधिकाऱ्यांनाच आहे, असे अस्पष्टपणे सांगितले जाते. अॅड. एम.पी. जयस्वाल म्हणाले, कामगारावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपण न्यायालयीन मार्गाचा अवलंब करुन काम असून कामगारांना कामावरुन बंद करा, असा कोणताच कायदा सांगता नाही. शासनकर्त्यातर्फे तसेच अधिकाऱ्यांतर्फे वन कामगारांची शुद्ध दिशाभूल केली जात आहे. मेळाव्याला दोनशेहून अधिक कामगार उपस्थित होते. आभार विठ्ठल पवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
चंद्रपुरात वनकामगारांचा मेळावा
By admin | Updated: May 8, 2016 00:51 IST