शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

विदेशी पर्यटकांना काढावी लागते हागणदारीतून वाट

By admin | Updated: December 2, 2015 00:47 IST

जगात वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारीव्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी चिमूर तालुक्यातील ...

मुख्य रस्ता घाणीने बरबटलेला : ताडोबाच्या प्रवेशद्वाराचे वास्तवराजकुमार चुनारकर खडसंगीजगात वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारीव्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी चिमूर तालुक्यातील कोलारा गावातून देश- विदेशातील पर्यटक येतात. देशात भारत स्वच्छ अभियान सुरू असताना चिमूर तालुक्यातील कोलारा गावाला मात्र स्वच्छतेचा विसर पडल्याचा प्रत्यय ताडोबाच्या भ्रमंतीसाठी येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटक तथा अतिविशिष्ट पर्यटकांना येत आहे. या मार्गाने ताबोडात प्रवेश करणाऱ्या विदेशी पर्यटकांना अक्षरश: हागणादारीतून वाट काढावी लागत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहचली आहे. या व्याघ्र प्रकल्पात हमखास वाघाचे दर्शन होते. त्यामुळे या प्रकल्पाला भेट देण्यासाठी महिन्याकाठी हजारो पर्यटक येतात. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, करांडला तथा वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पामुळे शासनाने नागपूरला टायगर कॅपीटल घोषित केले आहे.देश-विदेशातील पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी नागपूर शहरातून चंद्रपूर जिल्ह्यातूनच प्रवेश करावा लागतो. या प्रकल्पात जाण्यासाठी मोहर्ली गेट, नवेगाव गेट, कोलारा गेट व खुटवडा गेटवरुन जाता येते. यांपैकी मोहर्ली व कोलारा गेटवर पर्यटकांची अधिक पसंती आहे. त्यामुळे कोलारागेटवर देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात.चिमूर तालुक्यातील कोलारा गावात नऊ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. या गावाची लोकसंख्या साधारण दोन ते तीन हजारांच्या आत आहे. गावाच्या सभोवताल ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कोअर झोनचे जंगल लागले आहे., तर गाव मात्र पूर्ण वनविभागाच्या बफर झोनमध्ये वसले आहे. या गावात शिक्षणासाठी जिल्हा परिषदेची इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी चिमूरला जावे लागते. गावामध्ये मासळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र तथा फिरत पथक आहे. मात्र हे उपकेंद्र व फिरते पथक अनेक दिवसापासून आजारी पडले आहे. मात्र या समस्येसह गावात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे या जंगलव्याप्त गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.शासनाच्या हागणदारी मुक्त योजनेअंतर्गत या गावात काही प्रमाणात शौचालय तयार करण्यात आलेत. तसेच इंदिरा आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार ८५ टक्के शौचालय आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर अत्यल्प प्रमाणात असल्याचे वास्तव आहे. गावातील अनेक महिला व नागरिक शौचाससाठी उघड्यावरच जातात. त्यामुळे गावाच्या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूने हागणदारी निर्माण झाली आहे. तसेच गावात शेती व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांच्या खताचे खड्डे रस्त्याच्या दोन्ही बाजूने असल्याने खतामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे.स्वच्छ भारत मिशनचा स्थानिक ग्रामपंचायत तथा तालुका प्रशासनाला विसर पडल्याने कोलारा तोडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या देश- विदेशातील पर्यटकांना कोलारा गावातील वास्तव नजरेसमोर येत मोठ्या प्रमाणात हागणदारीचा सामना करावा लागत आहे. यातून पर्यटकांमध्ये काय संदेश जात असेल, याचा विचार करून स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.