शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात पाण्यासाठी होरपळ

By admin | Updated: April 16, 2017 00:25 IST

बहुसंख्य गावातील पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना असूनही त्या निष्फळ ठरत आहेत. पाणी हेच जीवन आहे. पण पाणी नसेल तर जीवन जगणे कठिण होते.

फेब्रुवारी ते जुलैमध्ये हाल : कायमस्वरूपी योजना कार्यान्वित कराशंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे जिवतीबहुसंख्य गावातील पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना असूनही त्या निष्फळ ठरत आहेत. पाणी हेच जीवन आहे. पण पाणी नसेल तर जीवन जगणे कठिण होते. अशीच परिस्थिती माणिकगडच्या पहाडावर आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून जिवती तालुक्यातील १३ पेक्षा अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरू आहे. रखरखत्या उन्हामध्ये नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.‘लोकमत’ने दि. १४ एप्रिल रोजी टंचाईग्रस्त गावांना भेटी दिल्या. यावेळी पाणी टंचाईचे वास्तव रूप पाहायला मिळाले. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्याप्रमाचे जिवाची काहिली होत आहे. या उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. माणिकगडावरील खडकी, मच्छिगुडा, चलवतगुडा, घोडणकप्पी, आनंदगुडा, संगणापूर, लोलडोह, पाटागुडा, वणी (खु.), पोचुगुडा, लेंडीगुडा, धनपठार, जनकापूर आदी १३ गावांपेक्षा अधिक गावे तालुक्यात टंचाईग्रस्त आहेत. मात्र नऊ गावांचा समावेश टंचाई आराखड्यामध्ये करण्यात आला आहे.शासन प्रत्येक वर्षी या गावांमधील टंचाई दूर करण्याठी लाखों रुपये खर्च करीत असते. तरीही वर्षांनुवर्षे या गावांना पाणी टंचाईची झळ पोहोचत असते. उन्हाळा आला की, प्रशासन गावात टँकरने पाणीपुरवठा करून मोकळे होते. त्यानंतर स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. फेब्रुवारीपासून टंचाई असली तरी जिल्हा प्रशासनाने टँकरची सोय केली नसल्याने मिळेल तेथून बैलगाडी, डोक्यावर हंडे भरून आणले जातात.सर्वांनाच पाणीटंचाईचा फटकापाणीटंचाई निर्माण झाल्याने गावातील शाळकरी मुलांपासून वयोवृद्ध व महिलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी भरताना मोठे गर्दी उसळत असते. त्यामुळे पाणी मिळण्यास उशीर होतो. त्यावेळी मुले शाळेत उशिरा पोहोचतात. दूषित पाण्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. संबंधित ग्रामपंचायतने वेळोवेळी ब्लिचिंग पावडर टाकले नसल्याने पाणी दूषित मिळत आहे. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. तसेच सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात विवाह समारंभ सुरू असून तेथे पाण्याची अडचण निर्माण होत आहे. काही सधन नागरिक प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या कॅन खरेदी करीत आहेत. मात्र गरिबांना पाणी खरेदी करून विवाहामध्ये पाहुण्यांना देणे परवडत नाही.जिल्हाधिकाऱ्यांचाही दौराजिवती तालुक्यात पाणी टंचाईचे भीषण स्वरूप निर्माण झाले असताना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे आणि उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासह आनंदगुडा या गावाला भेट दिली व पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले.पाणी टंचाईचा वन्यजीवांना फटकाउन्हाची तीव्रता वाढल्याने मानवासह वन्यजीव व पशुंनाही पाणी मिळणे कठिण झाले आहे. पाण्यासाठी जंगली पशू व प्राणी गावांकडे धाव घेत आहेत, त्यामुळे गावकरी भयभीत आहेत.सिंचनाची सोय व्हावीपरिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर-दऱ्या आहेत. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देवून सर्वेक्षण करावे. तलाव, बंधारे, मातीबांध आदी कामे केल्यास पाणी साठवण क्षमतेत वाढ होऊन पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल. पाणी टंचाईची आढावा बैठक झाल्यानंतर तहसीलदार रवींद्र राघोड व गटविकास अधिकारी मांडवे यांनी टंचाईग्रस्त गावांचा संयुक्त दौरा केला. आता कृतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.