शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

पूर तर ओसरला; मात्र रस्ते आणि पूल पोखरून निघाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:25 IST

तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था संघरक्षित तावाडे जिवती : गेले दोन दिवस पडलेल्या सततच्या पावसामुळे नदी - नाल्यांना पूर आला. ...

तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था

संघरक्षित तावाडे

जिवती : गेले दोन दिवस पडलेल्या सततच्या पावसामुळे नदी - नाल्यांना पूर आला. पुराच्या पाण्याने शेतीचे नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी घुसले. दुकानातील सामान वाहून गेले. सध्याच्या घडीला पूर ओसरला असला, तरी त्या पुराच्या पाण्यामुळे मात्र तालुक्यातील रस्ते आणि पूल पोखरून निघाले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

सर्वत्र पडलेल्या दोन दिवसांच्या संततधार पावसाने नदी नाले वाहून गेले. अनेक नाल्यांना पूर आला. त्यामुळे जिवती तालुक्यातील नव्याने सुरू असलेले रस्ते पूर्णपणे खड्डेमय बनले आहेत. जिवती - परमडोली, जिवती - कुंबेझरी, चिखली - टेकामांडवा - भारी या गावांना जोडणारे सर्वच रस्ते उखडून गेले आहेत. एवढेच नाही तर पुलावरील डांबरीकरण उखडून वाहून गेले. संपूर्ण तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या गिट्टी, मुरूम टाकून खडीकरण केले गेले आहे. त्यामुळे या पावसात रस्त्यावरील मुरूम वाहत जाऊन अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. एवढेच नाही तर रस्ते बनण्याअगोदर पुलाचे काम झाले. परंतु पुलाच्या आजूबाजूची माती पोखरून निघाल्यामुळे खड्डेच खडे पडले आहेत. येलापूर मार्ग, धनकदेवी नाल्यावर पूर आल्यामुळे पुलावरील डांबरीकरण उखडले आहे.