शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

पाच दिवसात कोरोनाने दगावले ४१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मार्चच्या शेवटपर्यंत दोन ते तीनच्या संख्येत असलेले ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मार्चच्या शेवटपर्यंत दोन ते तीनच्या संख्येत असलेले मृत्यूचे प्रमाण आता दिवसाला १५ ते १६ वर आले आहे. दरम्यान, पाच दिवसांमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या संसर्गाला आवर घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत; मात्र काही नागरिक आजही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.रुग्णांची संख्या ज्याप्रमाणे चिंतेची बाब बनत आहे त्यापेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे, उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूची आहे. मागील आठवडाभरात मृत्यूचे प्रमाण २ ते ३ एवढे होते; मात्र एप्रिल महिन्यामध्ये हा आकडा वाढत आहे. आता तर १५ ते १६ वर मृत्यू संख्या वाढली आहे. ६ ते ११ एप्रिलपर्यंतचा विचार केल्यास या दिवसामध्ये ४१ जणांचा जीव कोरोनाने घेतला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत; मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आता चिंतेत अधिकच भर पडली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. ६ एप्रिलला २ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ७ एप्रिलला ५ जणांचा, ८, ९ एप्रिलला प्रत्येकी ९ तर १० एप्रिलला सर्वाधिक १६ जणांचा जीव गेला आहे.

असे आहे मृत्यूचे प्रमाण

६ एप्रिल ०२

७ एप्रिल ०५

८ एप्रिल ०९

९ एप्रिल ०९

१० एप्रिल १६

११ एप्रिल ००

बाॅक्स

ज्येष्ठांसह तरुणांचाही समावेश

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले असून ज्येष्ठांसह आता तरुणांचाही बळी जात आहे. त्यामुळे प्रत्येकाची काळजी घेणे गरजेचे आहे. मागील दोन दिवसांचा विचार केल्यास चार ते पाच तरुणांचा यामध्ये बळी गेला आहे. त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.