शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

पाच दिवसात कोरोनाने दगावले ४१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मार्चच्या शेवटपर्यंत दोन ते तीनच्या संख्येत असलेले ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मार्चच्या शेवटपर्यंत दोन ते तीनच्या संख्येत असलेले मृत्यूचे प्रमाण आता दिवसाला १५ ते १६ वर आले आहे. दरम्यान, पाच दिवसांमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या संसर्गाला आवर घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत; मात्र काही नागरिक आजही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.रुग्णांची संख्या ज्याप्रमाणे चिंतेची बाब बनत आहे त्यापेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे, उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूची आहे. मागील आठवडाभरात मृत्यूचे प्रमाण २ ते ३ एवढे होते; मात्र एप्रिल महिन्यामध्ये हा आकडा वाढत आहे. आता तर १५ ते १६ वर मृत्यू संख्या वाढली आहे. ६ ते ११ एप्रिलपर्यंतचा विचार केल्यास या दिवसामध्ये ४१ जणांचा जीव कोरोनाने घेतला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत; मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आता चिंतेत अधिकच भर पडली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. ६ एप्रिलला २ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ७ एप्रिलला ५ जणांचा, ८, ९ एप्रिलला प्रत्येकी ९ तर १० एप्रिलला सर्वाधिक १६ जणांचा जीव गेला आहे.

असे आहे मृत्यूचे प्रमाण

६ एप्रिल ०२

७ एप्रिल ०५

८ एप्रिल ०९

९ एप्रिल ०९

१० एप्रिल १६

११ एप्रिल ००

बाॅक्स

ज्येष्ठांसह तरुणांचाही समावेश

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले असून ज्येष्ठांसह आता तरुणांचाही बळी जात आहे. त्यामुळे प्रत्येकाची काळजी घेणे गरजेचे आहे. मागील दोन दिवसांचा विचार केल्यास चार ते पाच तरुणांचा यामध्ये बळी गेला आहे. त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.