शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मासळ गावात पाणी पेटले

By admin | Updated: May 5, 2016 01:26 IST

जिल्ह्यात सूर्याचा पारा वाढल्याने विहिरी व बोअरवेलने तळ गाठला आहे. त्यामुळे मासळ गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

तीन महिलांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल : खासगी विहिरीवरुन दलितांना पाणी नाकारले चिमूर: जिल्ह्यात सूर्याचा पारा वाढल्याने विहिरी व बोअरवेलने तळ गाठला आहे. त्यामुळे मासळ गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पिढ्यान्पिढ्या भरत असलेल्या खासगी विहिरीवर अचानक दलितांना पाणी भरण्यास मज्जाव करीत गुंड व अन्य साहित्य फेकल्यावरुन तणावाची स्थिती उत्पन्न झाली. एकाच दिवशी मासळ (बु.) येथील तीन विहिरीवर केवळ दलित महिलांनाच मज्जाव करण्यात आल्याच्या कारणावरुन पीडितांनी चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.मंगळवारला आरोपींना अटक करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शेगाव भिसी येथील अतिरिक्त पोलीस दल व दंगा नियंत्रण पथक मासळ (बु.) येथे दाखल झाले होते. मात्र गावातील तणावाची स्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी कुणालाही आजपर्यंत अटक केली नाही. मात्र पोलिसांच्या ताफ्यामुळे मासळ गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.चिमूर तहसील अंतर्गत येणाऱ्या दोन हजार लोकवस्तीच्या मासळ गावात पिण्याच्या पाण्यासाठी महाजल योजनेच्या नळ योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र या नळ योजनेच्या स्रोतात पाणी नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे. मात्र या नळ योजनेचे पाणी दलित वस्तीपर्यंत येत नसल्याने येथील दलित वस्तीतील नागरिकांना शेतातील विहिरीवरुन पाणी आणून आपली तहान भागवावी लागते. आठवड्यापूर्वी या खासगी विहीरधारकांनी पाणी भरण्यास केवळ दलितांना मज्जावच केला नाही तर जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार चिमीर पोलीस स्टेशनला करण्यात आली. त्यावरुन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. (प्रतिनिधी)