शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

विषारी पाण्यामुळे तलावातील मासोळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:41 IST

सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील नान्होरी येथील दोन हेक्टर २८ आर जागेवर पसरलेल्या पंचगंगा मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या तलावात धानपिकावर फवारणी करण्यात आलेले विषारी औषधीयुक्त पाणी आल्याने तलावातील लाखो रुपयांच्या मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे सोसायटीचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत.त्यामुळे त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ मृत्युमुखी पडलेल्या मास्यांचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सोसायटीच्या सभासदांनी केली आहे.तलावाच्या आजूबाजूला असलेल्या अज्ञात शेतकऱ्याच्या शेतातील फवारणी करण्यात आलेले औषधीयुक्त पाणी तलावात आल्याने सदर मास्यांचा मृत्यू झाला असल्याचे सोसायटीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.तीन-चार दिवसाआधी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पाणी अधिक वाढल्याने सदर औषधीयुक्त पाणी तलावात आले आणि सदर औषधीयुक्त पाणी तलावाच्या पाण्यात मिसळले. त्यामुळे तलावात सोडण्यात आलेल्या मास्यांचा मृत्यू झाला, असे सोसायटीच्या सदस्यांचा आरोप आहे.दरम्यान, सरपंच, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत मृत्युमुखी पडलेल्या मास्यांचा पंचनामा करण्यात आला असून सदर पंचनाम्याची प्रत मत्सव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे सोसायटीच्या सभासदांनी सांगितले आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण