शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

विषारी पाण्यामुळे तलावातील मासोळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:41 IST

सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील नान्होरी येथील दोन हेक्टर २८ आर जागेवर पसरलेल्या पंचगंगा मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या तलावात धानपिकावर फवारणी करण्यात आलेले विषारी औषधीयुक्त पाणी आल्याने तलावातील लाखो रुपयांच्या मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे सोसायटीचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत.त्यामुळे त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ मृत्युमुखी पडलेल्या मास्यांचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सोसायटीच्या सभासदांनी केली आहे.तलावाच्या आजूबाजूला असलेल्या अज्ञात शेतकऱ्याच्या शेतातील फवारणी करण्यात आलेले औषधीयुक्त पाणी तलावात आल्याने सदर मास्यांचा मृत्यू झाला असल्याचे सोसायटीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.तीन-चार दिवसाआधी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पाणी अधिक वाढल्याने सदर औषधीयुक्त पाणी तलावात आले आणि सदर औषधीयुक्त पाणी तलावाच्या पाण्यात मिसळले. त्यामुळे तलावात सोडण्यात आलेल्या मास्यांचा मृत्यू झाला, असे सोसायटीच्या सदस्यांचा आरोप आहे.दरम्यान, सरपंच, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत मृत्युमुखी पडलेल्या मास्यांचा पंचनामा करण्यात आला असून सदर पंचनाम्याची प्रत मत्सव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे सोसायटीच्या सभासदांनी सांगितले आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण