शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST

शंकरपूर : सध्या कोरोनामुळे सगळ्या व्यवसायावर संकट आले असून मागील वर्षी हताश झालेल्या युवकांनी शेती, बेकरी, पानटपरी, वडापाव ...

शंकरपूर : सध्या कोरोनामुळे सगळ्या व्यवसायावर संकट आले असून मागील वर्षी हताश झालेल्या युवकांनी शेती, बेकरी, पानटपरी, वडापाव दुकान, दूध व्यवसाय, आईस गोला, लस्सी सेंटर, ज्युस सेंटर व इतर व्यवसाय परिसरात सुरू केले होते. परंतु कोरोना या संकटामुळे व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यात शेतीवर उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश असून आता तर भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांवरही मोठे संकट ओढावले आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामधून सावरत शेतकऱ्यांनी शेतामध्ये भाजीपाला पिकवायास सुरुवात केली. परंतु सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी तथा संचारबंदी लागू केली. शेतकरी शेतात असलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात लहान लहान दुकान थाटून व्यापारी पेक्षा कमी दरात नागरिकांना उपलब्ध करतो. मात्र आता सकाळी ७ ते ११ पर्यंत भाजीपाल्यांची दुकाने असल्याने त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. उन्हाळा सुरू असून लग्न समारंभाला सुरुवात झाली होती व शेतातील भाजीपाला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात व लग्न समारंभामध्ये विकत असायचे. कोरोनामुळे मागील वर्षी व यावर्षीसुद्धा लॉकडाऊनमुळे भाजीपाला विकता येत नाही.

बॉक्स

आठवडे बाजारही बंद

शंकरपूरला दर सोमवारी आठवडे बाजार भरत असून परिसरातील २८ खेडी जोडलेली आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे आठवडे बाजार भरवण्यावर बंदी असल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेले वांगे, टाेमाॅटाे, पालक, सांबार, कांदे, गोबी, कारले, तसेच टरबूज व इतर भाजीपाल्यांची विक्री मंदावली आहे. शेतात राबराब राबून भाजीपाला पिकवायचा आणि तो शेतातच ठेवायचा, अशी स्थिती झाली आहे.

बॉक्स

उरलेला भाजीपाला जनावरांना

मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होऊनही तो विकता येत नसल्याने अनेक शेतकरी भाजीपाला जनावरांना चारणे किंवा फेकून देणे पसंत करत आहेत. आधीच दुष्काळ, नापिकी अशा सर्वच बाजूने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाने ही पुन्हा चिंतेत टाकण्याचे काम केले आहे. एकूणच मागील चार पाच वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या वक्रदृष्टीने तर कधी शेतकरी विरोधी धोरणामुळे आर्थिक विवंचनेत असताना आता या टाळेबंदीने पुन्हा त्याला आर्थिक संकटात ओढले आहे.

कोट

आज माझ्या शेतात पालक, चवळी, भेंडी, वांगे यासारखे भाजीपाला पीक घेतले आहे. परंतु ठोक व्यापारी खरेदीसाठी येत नाही. माल मोठ्या प्रमाणात निघत असल्याने तेवढा भाजीपाला चिल्लरमध्ये विकल्या जात नाही. त्यामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

-स्वप्नील सावरकर, शेतकरी, शंकरपूर.