शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST

शंकरपूर : सध्या कोरोनामुळे सगळ्या व्यवसायावर संकट आले असून मागील वर्षी हताश झालेल्या युवकांनी शेती, बेकरी, पानटपरी, वडापाव ...

शंकरपूर : सध्या कोरोनामुळे सगळ्या व्यवसायावर संकट आले असून मागील वर्षी हताश झालेल्या युवकांनी शेती, बेकरी, पानटपरी, वडापाव दुकान, दूध व्यवसाय, आईस गोला, लस्सी सेंटर, ज्युस सेंटर व इतर व्यवसाय परिसरात सुरू केले होते. परंतु कोरोना या संकटामुळे व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यात शेतीवर उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश असून आता तर भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांवरही मोठे संकट ओढावले आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामधून सावरत शेतकऱ्यांनी शेतामध्ये भाजीपाला पिकवायास सुरुवात केली. परंतु सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी तथा संचारबंदी लागू केली. शेतकरी शेतात असलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात लहान लहान दुकान थाटून व्यापारी पेक्षा कमी दरात नागरिकांना उपलब्ध करतो. मात्र आता सकाळी ७ ते ११ पर्यंत भाजीपाल्यांची दुकाने असल्याने त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. उन्हाळा सुरू असून लग्न समारंभाला सुरुवात झाली होती व शेतातील भाजीपाला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात व लग्न समारंभामध्ये विकत असायचे. कोरोनामुळे मागील वर्षी व यावर्षीसुद्धा लॉकडाऊनमुळे भाजीपाला विकता येत नाही.

बॉक्स

आठवडे बाजारही बंद

शंकरपूरला दर सोमवारी आठवडे बाजार भरत असून परिसरातील २८ खेडी जोडलेली आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे आठवडे बाजार भरवण्यावर बंदी असल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेले वांगे, टाेमाॅटाे, पालक, सांबार, कांदे, गोबी, कारले, तसेच टरबूज व इतर भाजीपाल्यांची विक्री मंदावली आहे. शेतात राबराब राबून भाजीपाला पिकवायचा आणि तो शेतातच ठेवायचा, अशी स्थिती झाली आहे.

बॉक्स

उरलेला भाजीपाला जनावरांना

मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होऊनही तो विकता येत नसल्याने अनेक शेतकरी भाजीपाला जनावरांना चारणे किंवा फेकून देणे पसंत करत आहेत. आधीच दुष्काळ, नापिकी अशा सर्वच बाजूने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाने ही पुन्हा चिंतेत टाकण्याचे काम केले आहे. एकूणच मागील चार पाच वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या वक्रदृष्टीने तर कधी शेतकरी विरोधी धोरणामुळे आर्थिक विवंचनेत असताना आता या टाळेबंदीने पुन्हा त्याला आर्थिक संकटात ओढले आहे.

कोट

आज माझ्या शेतात पालक, चवळी, भेंडी, वांगे यासारखे भाजीपाला पीक घेतले आहे. परंतु ठोक व्यापारी खरेदीसाठी येत नाही. माल मोठ्या प्रमाणात निघत असल्याने तेवढा भाजीपाला चिल्लरमध्ये विकल्या जात नाही. त्यामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

-स्वप्नील सावरकर, शेतकरी, शंकरपूर.