शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

अखेर शेतकऱ्यांना मिळाले पाणी

By admin | Updated: September 1, 2016 01:28 IST

मागील अनेक दिवसांपासून पाण्याने पाठ फिरविल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हातात आलेले पीक वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे

मुनगंटीवार यांचे प्रयत्न : शेतकऱ्यांचे विद्युत बिल माफमूल : मागील अनेक दिवसांपासून पाण्याने पाठ फिरविल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हातात आलेले पीक वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही बाब माहीेत होताच त्यांनी पाणसाऱ्यापैकी ४१ लाख रुपयांचा भरणा करुन शेतीसाठी हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून सात गावातील शेकडो शेतकऱ्यांना हरणघाट उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळत आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष चंदू मारगोनवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील दर्पण सार्वजनिक वाचनालयामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मारगोनवार पुढे म्हणाले, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पाअंतर्गत बोरचांदली, राजगड, विरई, फिस्कुटी, गडीसुर्ला, जुनासूर्ला आणि बेंबाळ ही सात गावे आहेत. मागील अनेक वर्षापासून सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे या भागातील शेतकऱ्यांकडे हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पाण्यासाराची रक्कम थकीत आहे. ही थकबाकी सुमारे एक कोटी २५ लाखांपर्यंत गेली आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीला दाखविलेला जोर आता ओसरला आहे. पाण्याअभावी पीक करपायला लागली आहे. अनेकांचे तर अजून रोवणेही बाकी आहे.शेतकऱ्यांनी हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याची विनंती केली. परंतु जुन्या थकीत रकमेमुळे पाणी सोडण्यास नकार दिला. अशा स्थितीत शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असल्याने हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन परिसरातील शेतकऱ्यांनी मुनगंटीवार यांना दिले. निवेदनातून शेतकऱ्यांनी मांडलेली अडचण लक्षात घेऊन त्यांनी शासनाच्या देखभाल दुरुस्ती निधीतून ४१ लाख रुपये भरणा केली आणि उपसा जलसिंचन प्रकल्पातून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुनगंटीवार यांच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यामुळे या परिसरातील शेतकरी पार भारावून गेल्याचेही मारगोनवार यांनी यावेळी सांगितले. सदर प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले असल्यामुळे शेवटच्या टोकावर वसलेल्या दिघोरी या गावापर्यंत पाणी पोहचत आहे. या प्रकल्पाच्या नहराचेही काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश ना. मुनगंटीवार यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. पत्रकार परिषदेला चांदापूरचे माजी उपसरपंच राजू पोटे, भाजयुमोचे महामंत्री दिलीप पाल, नवथाव वाढई, अभिषेक पोरेड्डीवार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)