शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

अखेर शेतकऱ्यांना मिळाले पाणी

By admin | Updated: September 1, 2016 01:28 IST

मागील अनेक दिवसांपासून पाण्याने पाठ फिरविल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हातात आलेले पीक वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे

मुनगंटीवार यांचे प्रयत्न : शेतकऱ्यांचे विद्युत बिल माफमूल : मागील अनेक दिवसांपासून पाण्याने पाठ फिरविल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हातात आलेले पीक वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही बाब माहीेत होताच त्यांनी पाणसाऱ्यापैकी ४१ लाख रुपयांचा भरणा करुन शेतीसाठी हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून सात गावातील शेकडो शेतकऱ्यांना हरणघाट उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळत आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष चंदू मारगोनवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील दर्पण सार्वजनिक वाचनालयामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मारगोनवार पुढे म्हणाले, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पाअंतर्गत बोरचांदली, राजगड, विरई, फिस्कुटी, गडीसुर्ला, जुनासूर्ला आणि बेंबाळ ही सात गावे आहेत. मागील अनेक वर्षापासून सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे या भागातील शेतकऱ्यांकडे हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पाण्यासाराची रक्कम थकीत आहे. ही थकबाकी सुमारे एक कोटी २५ लाखांपर्यंत गेली आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीला दाखविलेला जोर आता ओसरला आहे. पाण्याअभावी पीक करपायला लागली आहे. अनेकांचे तर अजून रोवणेही बाकी आहे.शेतकऱ्यांनी हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याची विनंती केली. परंतु जुन्या थकीत रकमेमुळे पाणी सोडण्यास नकार दिला. अशा स्थितीत शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असल्याने हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन परिसरातील शेतकऱ्यांनी मुनगंटीवार यांना दिले. निवेदनातून शेतकऱ्यांनी मांडलेली अडचण लक्षात घेऊन त्यांनी शासनाच्या देखभाल दुरुस्ती निधीतून ४१ लाख रुपये भरणा केली आणि उपसा जलसिंचन प्रकल्पातून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुनगंटीवार यांच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यामुळे या परिसरातील शेतकरी पार भारावून गेल्याचेही मारगोनवार यांनी यावेळी सांगितले. सदर प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले असल्यामुळे शेवटच्या टोकावर वसलेल्या दिघोरी या गावापर्यंत पाणी पोहचत आहे. या प्रकल्पाच्या नहराचेही काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश ना. मुनगंटीवार यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. पत्रकार परिषदेला चांदापूरचे माजी उपसरपंच राजू पोटे, भाजयुमोचे महामंत्री दिलीप पाल, नवथाव वाढई, अभिषेक पोरेड्डीवार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)