शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर मासळ येथील दोन्ही जलशुद्धीकरण यंत्रे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST

नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थाबणार : ग्रामपंचायतीने घेतली दखल मासळ ( बु ) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या ...

नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थाबणार : ग्रामपंचायतीने घेतली दखल

मासळ ( बु ) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या आदर्श ग्रामपंचायत मासळ बु. येथील दोन्ही जलशुद्धीकरण यंत्र मागील काही दिवसांपूर्वी निष्क्रिय झाले होते. विहिरीने तळ गाठला होता. याबाबत ‘लोकमत’ने ४ एप्रिलला मासळ बु. येथे ‘पिण्याच्या पाण्याची टंचाई’ या आशयाखाली वृत्त प्रकाशित करताच ग्रामपंचायतीने दोन खासगी विहिरी अधिग्रहित करून दोन्ही जलशुद्धीकरण यंत्रे सुरू केली.

त्यामुळे आता नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती थांबणार आहे.

आदर्श ग्रामपंचायत मासळ बु.च्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून सन २०१४-२०१५ मध्ये पिण्याचे पाणी मिळावे म्हणून स्थानिक ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जलशुद्धीकरण संयंत्र बसविले. माजी आमदार मितेश भांगडिया यांच्या स्थानिक विकास निधीतून सन २०१४-२०१५ ला नंदारा रोडवरील अंगणवाडी क्र. ३ जवळ दुसरे जलशुद्धीकरण संयंत्र बसविले. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जलशुद्धीकरण यंत्राच्या विहिरीने तळ गाठल्याने मागील काही दिवसांपासून दोन्ही जलशुद्धीकरण संयंत्र बंद होते. त्यामुळे नागरिकांना करबडा फाटा, कोलारा फाटा येथून हातपंपाचे पाणी आणावे लागत होते.

अखेर ही समस्या लक्षात घेता व गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती थाबावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गावालगतच्या विहिरी अधिग्रहित करण्याचा ठराव घेतला. त्यामुळे गावालगत अंगणवाडी क्र. ३ परिसरातील डॉ. देवनाथ गंधारे यांची विहीर अधिग्रहित केली, तर ग्रामपंचायत प्रांगणातील हनुमान मंदिराची बोअर मशीन अधिग्रहित केल्याने आता मासळवासीय जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे.