शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

महिलांच्या सुरक्षिततेचा लढा आयुष्यभर

By admin | Updated: January 3, 2017 00:40 IST

महिला आणि पुरुष ही समाजातील रथाची दोन चाके आहेत. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे,

महिलांची पिळवणूक चिंताजनक : महिला मुक्ती दिनानिमित्त विचार व्हावा प्रकाश काळे गोवरी महिला आणि पुरुष ही समाजातील रथाची दोन चाके आहेत. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली असली तरी आजही समाजात महिलांची होणारी पिळवणूक चिंतेचा विषय आहे. दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महिलांचा आयुष्यभर हक्कासाठी लढा सुरु आहे. महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा. तसेच महिलांची पिळवणूक कायमची थांबावी, यासाठी देशभरात समाािजक संघटनांच्या माध्यमातून स्त्री सुरक्षिततेच्या लढ्याची धगधगती मशाल आजही पेटत आहे. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन होत करावे लागते. समाजात अशा असंख्य महिला आहेत. त्यांना हक्कासाठी झुंजतांना संपूर्ण आयुष्यच मातीमोल करावे लागले आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी गगनभरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्याचा अधिकार मिळतो, हा प्रश्न साऱ्यांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे असले तरी प्रत्यक्षात आज किती महिला सुरक्षित आहेत, याचाही महिला मुक्तीदिनी विचार झाला पाहिजे. आज दिवसा रस्त्याने जाणारी महिलाही सुरक्षित नाही रस्त्याने जाताना तिला अनेकांचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. मग कायदा कडक करुन चालणार नाही. तर महिलांविषयी प्रत्येकांच्या मनात असलेली सहानुभूती असणे, समाजिक परिवर्तन करणे आज काळाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी व्यापले आहे. पुरुषाच्या बरोबरीने महिलांना काम करण्याची संधी मिळाल्याने स्त्री प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तरीही महिलांना जीवन जगत असताना त्यांचे हक्क व पुरेपूर अधिकार मिळत नाही, हे समाजातील महिलांचे धकधकते वास्तव आजही कायम आहे. महिलांची समाजात होणारी पिळवणूक आजही थांबली नाही. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कडक कायदे केले आहे. परंतु महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. महिला मुक्तीचा डांगोरा देशभरात पिटला जातो. मग महिलांना दिवसाही एकटीे फिरायला भीती का वाटते, हा अनेकांना अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे. तो स्त्री स्वातंत्र्याचे वाभाडे काढणारा आहे. महिलांना त्यांचे अधिकार हक्क मिळाले म्हणजे स्त्री मुक्त झाली, असे आपण्याला म्हणता येणार नाही. तर महिला मुक्त सुरक्षिततेची पताका सर्वांनी होऊन महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज आहे. तेव्हाच कुठे आपणाला महिलामुक्ती दिन साजरा करण्याचा अभिमान वाटेल. अन्यथा सुरक्षिततेअभावी महिलांचा जीवन प्रवास क्षणाक्षणाला असाच काळरात्र ठरेल. काय केला जातो आजही महिलांवर अन्याय? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईनी महिलांना शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी काबीज केले आहे. परंतु आज महिलांवर होणारा अन्याय अत्याचार चिंतेचा विषय झाला आहे. यावर समाजवर्तुळात विचार मंथन करणे गरजेचे आहे.