शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

महिलांच्या सुरक्षिततेचा लढा आयुष्यभर

By admin | Updated: January 3, 2017 00:40 IST

महिला आणि पुरुष ही समाजातील रथाची दोन चाके आहेत. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे,

महिलांची पिळवणूक चिंताजनक : महिला मुक्ती दिनानिमित्त विचार व्हावा प्रकाश काळे गोवरी महिला आणि पुरुष ही समाजातील रथाची दोन चाके आहेत. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली असली तरी आजही समाजात महिलांची होणारी पिळवणूक चिंतेचा विषय आहे. दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महिलांचा आयुष्यभर हक्कासाठी लढा सुरु आहे. महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा. तसेच महिलांची पिळवणूक कायमची थांबावी, यासाठी देशभरात समाािजक संघटनांच्या माध्यमातून स्त्री सुरक्षिततेच्या लढ्याची धगधगती मशाल आजही पेटत आहे. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन होत करावे लागते. समाजात अशा असंख्य महिला आहेत. त्यांना हक्कासाठी झुंजतांना संपूर्ण आयुष्यच मातीमोल करावे लागले आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी गगनभरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्याचा अधिकार मिळतो, हा प्रश्न साऱ्यांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे असले तरी प्रत्यक्षात आज किती महिला सुरक्षित आहेत, याचाही महिला मुक्तीदिनी विचार झाला पाहिजे. आज दिवसा रस्त्याने जाणारी महिलाही सुरक्षित नाही रस्त्याने जाताना तिला अनेकांचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. मग कायदा कडक करुन चालणार नाही. तर महिलांविषयी प्रत्येकांच्या मनात असलेली सहानुभूती असणे, समाजिक परिवर्तन करणे आज काळाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी व्यापले आहे. पुरुषाच्या बरोबरीने महिलांना काम करण्याची संधी मिळाल्याने स्त्री प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तरीही महिलांना जीवन जगत असताना त्यांचे हक्क व पुरेपूर अधिकार मिळत नाही, हे समाजातील महिलांचे धकधकते वास्तव आजही कायम आहे. महिलांची समाजात होणारी पिळवणूक आजही थांबली नाही. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कडक कायदे केले आहे. परंतु महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. महिला मुक्तीचा डांगोरा देशभरात पिटला जातो. मग महिलांना दिवसाही एकटीे फिरायला भीती का वाटते, हा अनेकांना अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे. तो स्त्री स्वातंत्र्याचे वाभाडे काढणारा आहे. महिलांना त्यांचे अधिकार हक्क मिळाले म्हणजे स्त्री मुक्त झाली, असे आपण्याला म्हणता येणार नाही. तर महिला मुक्त सुरक्षिततेची पताका सर्वांनी होऊन महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज आहे. तेव्हाच कुठे आपणाला महिलामुक्ती दिन साजरा करण्याचा अभिमान वाटेल. अन्यथा सुरक्षिततेअभावी महिलांचा जीवन प्रवास क्षणाक्षणाला असाच काळरात्र ठरेल. काय केला जातो आजही महिलांवर अन्याय? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईनी महिलांना शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी काबीज केले आहे. परंतु आज महिलांवर होणारा अन्याय अत्याचार चिंतेचा विषय झाला आहे. यावर समाजवर्तुळात विचार मंथन करणे गरजेचे आहे.