शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षिततेचा लढा आयुष्यभर

By admin | Updated: January 3, 2017 00:40 IST

महिला आणि पुरुष ही समाजातील रथाची दोन चाके आहेत. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे,

महिलांची पिळवणूक चिंताजनक : महिला मुक्ती दिनानिमित्त विचार व्हावा प्रकाश काळे गोवरी महिला आणि पुरुष ही समाजातील रथाची दोन चाके आहेत. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली असली तरी आजही समाजात महिलांची होणारी पिळवणूक चिंतेचा विषय आहे. दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महिलांचा आयुष्यभर हक्कासाठी लढा सुरु आहे. महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा. तसेच महिलांची पिळवणूक कायमची थांबावी, यासाठी देशभरात समाािजक संघटनांच्या माध्यमातून स्त्री सुरक्षिततेच्या लढ्याची धगधगती मशाल आजही पेटत आहे. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन होत करावे लागते. समाजात अशा असंख्य महिला आहेत. त्यांना हक्कासाठी झुंजतांना संपूर्ण आयुष्यच मातीमोल करावे लागले आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी गगनभरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्याचा अधिकार मिळतो, हा प्रश्न साऱ्यांनाच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे असले तरी प्रत्यक्षात आज किती महिला सुरक्षित आहेत, याचाही महिला मुक्तीदिनी विचार झाला पाहिजे. आज दिवसा रस्त्याने जाणारी महिलाही सुरक्षित नाही रस्त्याने जाताना तिला अनेकांचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. मग कायदा कडक करुन चालणार नाही. तर महिलांविषयी प्रत्येकांच्या मनात असलेली सहानुभूती असणे, समाजिक परिवर्तन करणे आज काळाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी व्यापले आहे. पुरुषाच्या बरोबरीने महिलांना काम करण्याची संधी मिळाल्याने स्त्री प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तरीही महिलांना जीवन जगत असताना त्यांचे हक्क व पुरेपूर अधिकार मिळत नाही, हे समाजातील महिलांचे धकधकते वास्तव आजही कायम आहे. महिलांची समाजात होणारी पिळवणूक आजही थांबली नाही. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कडक कायदे केले आहे. परंतु महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. महिला मुक्तीचा डांगोरा देशभरात पिटला जातो. मग महिलांना दिवसाही एकटीे फिरायला भीती का वाटते, हा अनेकांना अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे. तो स्त्री स्वातंत्र्याचे वाभाडे काढणारा आहे. महिलांना त्यांचे अधिकार हक्क मिळाले म्हणजे स्त्री मुक्त झाली, असे आपण्याला म्हणता येणार नाही. तर महिला मुक्त सुरक्षिततेची पताका सर्वांनी होऊन महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज आहे. तेव्हाच कुठे आपणाला महिलामुक्ती दिन साजरा करण्याचा अभिमान वाटेल. अन्यथा सुरक्षिततेअभावी महिलांचा जीवन प्रवास क्षणाक्षणाला असाच काळरात्र ठरेल. काय केला जातो आजही महिलांवर अन्याय? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईनी महिलांना शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी काबीज केले आहे. परंतु आज महिलांवर होणारा अन्याय अत्याचार चिंतेचा विषय झाला आहे. यावर समाजवर्तुळात विचार मंथन करणे गरजेचे आहे.