शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पोलिसांच्या सर्वोत्तम कामगिरीचा सत्कार

By admin | Updated: January 3, 2016 01:30 IST

पुरस्कार, सत्कारातून कर्तव्यनिष्ठेने काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी पुन्हा वाढते, असे बोलले जाते.

प्रत्येक महिन्यात कार्यक्रम : पोलीस अधीक्षकांची योजनाचंद्रपूर : पुरस्कार, सत्कारातून कर्तव्यनिष्ठेने काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी पुन्हा वाढते, असे बोलले जाते. हाच धागा ओळखून पोलीस विभागाने उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांचा प्रत्येक महिन्यात सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्कृष्ट कामाची पावती सत्काराच्या रूपात उतरविण्याचा हा निर्णय कर्तव्यदक्ष पोलिसांचे निश्चितच मनोबल उंचावणारा ठरणार आहे. जिल्हा पोलीस विभागाकडून १ जानेवारीपासून या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.पोलीस विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या धावपळीच्या व गुंतागुंतीच्या जीवनात अनेक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. अशा स्थितीतही पोलीस कर्मचारी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहेत. त्यामुळे पोलीस दलाचे नावलौकिक होण्यासोबतच पोलिसांच्या कामाची गुणवत्ताही वाढत आहे. कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्याच्या उद्देशातून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दरमहा सत्कार कार्यक्रम घेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून पोलिसांची जनमानसात प्रतिमा उंचावण्यासोबतच पोलीस दलाच्या कामकाजात सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांची ‘उत्कृष्ट/सर्वोत्तम’ अशी निवड करून त्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि रिवॉर्ड देऊन सत्कार केला जाणार आहे. उत्कृष्ट ठाणे अंमलदार, उत्कृष्ट आरटीपीसी, उत्कृष्ट तपासी अंमलदार (जेएमएफसी), उत्कृष्ट तपासी अंमलदार (सेशन), उत्कृष्ट डिटेक्शन इंटलिजन्स (गुन्हे उघडकीस), उत्कृष्ठ बीट अंमलदार, उत्कृष्ट दूरक्षेत्र प्रभारी, उत्कृष्ट वाहतूक कर्मचारी, उत्कृष्ट वाहन चालक, उत्कृष्ट पैरवी अधिकारी, उत्कृष्ट कर्मचारी (नवनवीन योजना, कार्य करणारे), उत्कृष्ट पोलीस पाटील (सर्व उपविभागातून प्रत्येकी एक), उत्कृष्ट पोलीस मित्र (सर्व उपविभागातून प्रत्येकी एक), उत्कृष्ट पोलीस ठाणे (दरमहा जिल्ह्यातून एक) याप्रमाणे सत्कार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)