शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी, आर्वीनंतर टोळ धाड जिल्ह्यात दाखल होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय महत्वाची अत्यंत खादाड व नुकसान करणारी किड आहे. ती मोठ्या प्रमाणात पिकाचे व इतर वनस्पतीचे व झाडाझुडपांचे नुकसान करते. वाळवंटी टोळ या बहुभक्षी किडीचे शास्त्रीय नाव स्किस्टोसेर्का ग्रीगेरिया हे आहे. किड दोन प्रकारच्या अवस्थेत आढळून येते. पहिली अवस्था म्हणजे,एकाकी अवस्था जिच्यामध्ये ही किड एकटी किंवा विरळ असते. अनुकूल हवामानात ही किड समुहाने किंवा थव्यात आढळते.

ठळक मुद्देवेळीच करा उपाययोजना : कृषी विभाग व सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजस्थानातून मध्यप्रदेशात थैमान घालून सातपुडा पर्वत रांगामधुन अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील उत्पादक पट्ट्यात टोळधाडीचे थवे पोहोचले आहे. त्यानंतर लगतच्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे सुद्धा या कीडीचे थवे आल्यामुळे हवेच्या दिशेने वाटचाल करुन किंवा अन्नाच्या उपलब्धतेनुसार ते चंद्रपूर जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय महत्वाची अत्यंत खादाड व नुकसान करणारी किड आहे. ती मोठ्या प्रमाणात पिकाचे व इतर वनस्पतीचे व झाडाझुडपांचे नुकसान करते. वाळवंटी टोळ या बहुभक्षी किडीचे शास्त्रीय नाव स्किस्टोसेर्का ग्रीगेरिया हे आहे. किड दोन प्रकारच्या अवस्थेत आढळून येते. पहिली अवस्था म्हणजे,एकाकी अवस्था जिच्यामध्ये ही किड एकटी किंवा विरळ असते. अनुकूल हवामानात ही किड समुहाने किंवा थव्यात आढळते. या अवस्थेला समूह अवस्था किवा थव्याची अवस्था असे म्हणतात. थव्याच्या अवस्थेत ही किड मोठे अंतर भ्रमण करु शकते व मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करु शकते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन उपाययोजना करण्याचे आवाहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. नागदेवते, कीटकशास्त्रज्ञ प्रवीण देशपांडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे, शेजारील जिल्ह्यात किड दाखल झाल्याने येथे येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.असे आहे जीवनचक्रअंडी अवस्था : या किडीची प्रौढ मादी १५० ते २०० अंडी ओलसर रेताड जमिनीत शेंगासारख्या लांबुळक्या आवरणामध्ये समुहाने घालते. शेंगासारखे आवरण रेतीमध्ये १० ते १५ सेंटीमिटर आत असते. जमिनीतील ओलावा, आद्रता व तापमानानुसार अंडी उगवण्याचा कालावधी १० ते १२ दिवसापासून चार आठवड्याचा असतो.पिल्लांच्या अवस्था : अंडी उगवल्यानंतर त्यातून या किडीचे पिल्ले बाहेर पडतात. टोळ या किडीच्या एकाकी अवस्थेत पिल्लांच्या ५ अवस्था तर समुह किंवा थवा अवस्थेत पिलांच्या ६ अवस्था असतात. साधारणता ३७ डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान असल्यास पिल्ले २२ दिवसात तर २२ डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान असल्यास या किडीची पिल्ले अवस्था ७० दिवसात पूर्ण होते.प्रौढ अवस्था : पाचव्या अवस्थेतील या किडीची पिल्ले कात टाकल्यानंतर प्रौढ अवस्थेत प्रवेश करतात. सुरुवातीच्या काळात प्रौढावस्थेत पंख नाजुक असल्यामुळे ते उडु शकत नाहीत. परंतु, परिपक्व प्रौढावस्थेत ते उडु शकतात. हिच अवस्था पिकांना व झाडांना जास्त नुकसानदायक अवस्था असते.सर्वसाधारणपणे १० हजार प्रौढ टोळ प्रती हेक्टर किंवा ५ ते ६ पिल्ले प्रती झुडूप अशाप्रकारे किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन शेतकºयांनी गरजेनुसार या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपाय योजना करु शकतात. शेतात टिनाचे डबे, प्लॉस्टिक बॉटल, वाद्य व इतर साहित्याचा वापर करुन मोठा आवाज काढल्यास ही किड शेतात बसणे टाळते. शेतात कडूनिंब, धोत्रा इतर तण किंवा पालापाचोळा जाळून धुर व शेकोटीचा वापर केल्यास या धुरामुळे शेतात बसणे टाळेल. या टोळधाडची सवय थव्याने एक दिशेने जाण्याची असल्यामुळे पुढे येणाºया थव्याच्या वाटेवर ६० सेंटीमीटर रुंद व ७५ सेंटीमीटर खोल चर खोदुन त्यात या पिल्लांना पकडता येते. सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी झाडाझुडपावर टोळ जमा होते. त्यामुळे अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून धुर केल्याने किडीचे व्यवस्थापन मिळते. थव्याच्या स्थितीत पिलांची संख्या जास्त असल्यास पाच टक्के निबोळी अर्क किंवा निंबोळी तेल ५० मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारणी करावी. २० किलो गहू किंवा धानाच्या तुसामध्ये फिप्रोनील ५ एससी ३ मिली मिसळून याचे ढीग शेतात ठेवावे. याकडे टोळधाड आकर्षित होऊन कीटकनाशकांमुळे मरतात.

टॅग्स :agricultureशेती