शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

सिग्नल बंदमुळे अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:40 IST

कव्हरेजअभावी मोबाईल सेवा ठप्प जिवती : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या ...

कव्हरेजअभावी मोबाईल सेवा ठप्प

जिवती : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त झाले आहे. काही महिन्यांपासून कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये समस्या निर्माण झाली आहे.

वडगाव परिसरातील पथदिवे बंद

चंद्रपूर : वडगाव परिसरातील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या सुमारास या मार्गावर अंधार पसरलेला असतो. त्यामुळे किरकोळ अपघात घडत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

चंद्रपूर : कोरपना, जिवती मार्गावरील अनेक बसथांब्यावर असलेल्या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी निवाऱ्यांचे छत तुटली आहेत, तर अनेकांच्या भिंती पडल्या आहेत. त्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जात आहे.

स्वच्छता करण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील बहुतांश वार्डातील नाल्यांची स्वच्छता नियमित केली जात नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाल्याची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.

काम देण्याची बेरोजगारांची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील स्थानिक युवकांना पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बेरोजगारांनी केली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने उद्योग असतानाही बेरोजगार इतरत्र भटकत आहे. त्यामुळे अन्याय दूर करून रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंद केलेल्या सर्वांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट लाऊन वाहनचालक सर्रासपणे वाहन रस्त्यावरून चालवितात; मात्र या वाहनांवर कारवाई करण्यास संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी स्टंट करणाऱ्या एका वाहनचालकांना सामान्य नागरिकाला धडक दिल्याने अपघात झाला होता.

सोयी उपलब्ध करून द्याव्या

चंद्रपूर : कोरपना व गडचांदूर, तसेच जिल्ह्यातील इतर मार्केट यार्डमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने धान्य विक्री, तसेच जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र, या ठिकाणी शेतकरी व जनावरांची प्रचंड गैरसोय होत आहे.

आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा पुरवाव्या

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांना जिल्हा सामान्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तसेच खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागत आहे. यात आर्थिक ताण पडत आहे. आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.