शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांबूतोडीनंतरही एफडीसीएम झोपेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 00:40 IST

एफडीसीएमच्या मध्य चांदा विभागाला हादरवून सोडणारा प्रकार कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात घडला आहे.

कन्हाळगाव क्षेत्रातील प्रकरण : अद्याप साधी चौकशीदेखील नाहीकोठारी : एफडीसीएमच्या मध्य चांदा विभागाला हादरवून सोडणारा प्रकार कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात घडला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याच यंत्रणेकडून हा बेकायदेशीर प्रकार घडला. हा गंभीर प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस येऊनही एफडीसीएम प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.निर्धारित क्षेत्रात बांबू कटाई करायची असताना सीमांकन क्षेत्राबाहेरील बांबू वनावर एफडीसीएमच्या यंत्रणेनी हात साफ केला. यंत्रणेला केवळ परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३१ मधील बांबूच्या कटाईची मुभा होती. मात्र, त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करुन बेकायदेशीररीत्या कक्ष क्रमांक १३९ मधील ओल्या व भरीव बांबूची बेसुमार कत्तल केली. कक्ष क्रमांक १३१ मध्ये १३९ च्या तुलनेत बांबूचे वन फार दुर्मिळ बघायला मिळते. मात्र, अजूनही एफडीसीएमच्या यंत्रणेने या प्रकाराला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्रयस्थ विभाग किंवा व्यक्तींकडून असा प्रकार घडला असता तर पुरते एफडीसीएम खडबडून जागे झाले असते. मात्र बेकायदेशीर बांबूतोडीचा हा प्रकार खुद्द त्यांच्या यंत्रणेकडूनच घडल्याने सध्या या विषयावर कुणीच बोलायला तयार नाही. पाच- दहा नव्हे, तर तब्बल ५० ते ६० हजार बांबूची कत्तल केल्याचा अंदाज आहे. सदर खळबळजनक प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर या प्रकरणातील एफडीसीएमच्या यंत्रणेची भूमिका हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सुरुवातीला मजुरांच्या झोपडीसाठी १० ते १५ बांबूची कक्ष क्रमांक १३९ मधून कटाई केल्याचे सांगितल्या गेले. यानंतर लगेच २४ तासातच वन कर्मचाऱ्यांचा सूर बदलला. त्यांच्या वर्तुळात केवळ २०० ते ३०० बांबूची बेकायदा कत्तल करण्यात आल्याची चर्चा रंगू लागली. त्यामुळे वन कर्मचारी अजूनही या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर कन्हाळगाव वनपरिक्षेत्रातील वनाधिकारीसुद्धा प्रकरणातील वेगवेगळे पैलू दिवसागणिक उघड होत असल्याचे पाहून चांगलेच चक्रावले आहेत. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी अजूनपर्यंत या बेकायदेशीर कारनाम्याची चौकशी करण्याचे धाडस केले नाही. शेवटी कन्हाळगाव परिक्षेत्रातील कामे येथील वनाधिकाऱ्यांच्या देखरेख व नियंत्रणाखाली आतापर्यंत होत आली. असताना बांबूतोड प्रकरणातील मार्गदर्शक कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर प्रकार आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी एफडीसीएमच्या यंत्रणेनी केला असावा, असा तर्कसुद्धा लावला जात आहे. दुसरीकडे उद्दिष्टपूर्ती झाली असल्यास घनदाट जंगलात घडलेल्या या प्रकारातून यंत्रणा कर्मचाऱ्यांचे हित साधणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सध्या लिलावात परिसरातील बांबूचा दर ३५ ते ४० रुपये सुरु असल्याची माहिती आहे. हाच बांबू ठेकेदाराला कमी दरात मिळाल्यास ते या बाबूंची केव्हाही उचल करतील. अशावेळी येथील बांबूच्या साठ्याची महिनाभरापासून अजूनपर्यंत उचल केली नसल्याने हा बांबू लिलावात जाणार की, इतर कुठल्या मार्गाने याचा बंदोबस्त लावला जाईल, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (वार्ताहर)