शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

बेकायदा बांबूतोडीनंतरही एफडीसीएम झोपेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 00:40 IST

एफडीसीएमच्या मध्य चांदा विभागाला हादरवून सोडणारा प्रकार कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात घडला आहे.

कन्हाळगाव क्षेत्रातील प्रकरण : अद्याप साधी चौकशीदेखील नाहीकोठारी : एफडीसीएमच्या मध्य चांदा विभागाला हादरवून सोडणारा प्रकार कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात घडला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याच यंत्रणेकडून हा बेकायदेशीर प्रकार घडला. हा गंभीर प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस येऊनही एफडीसीएम प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.निर्धारित क्षेत्रात बांबू कटाई करायची असताना सीमांकन क्षेत्राबाहेरील बांबू वनावर एफडीसीएमच्या यंत्रणेनी हात साफ केला. यंत्रणेला केवळ परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३१ मधील बांबूच्या कटाईची मुभा होती. मात्र, त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करुन बेकायदेशीररीत्या कक्ष क्रमांक १३९ मधील ओल्या व भरीव बांबूची बेसुमार कत्तल केली. कक्ष क्रमांक १३१ मध्ये १३९ च्या तुलनेत बांबूचे वन फार दुर्मिळ बघायला मिळते. मात्र, अजूनही एफडीसीएमच्या यंत्रणेने या प्रकाराला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्रयस्थ विभाग किंवा व्यक्तींकडून असा प्रकार घडला असता तर पुरते एफडीसीएम खडबडून जागे झाले असते. मात्र बेकायदेशीर बांबूतोडीचा हा प्रकार खुद्द त्यांच्या यंत्रणेकडूनच घडल्याने सध्या या विषयावर कुणीच बोलायला तयार नाही. पाच- दहा नव्हे, तर तब्बल ५० ते ६० हजार बांबूची कत्तल केल्याचा अंदाज आहे. सदर खळबळजनक प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर या प्रकरणातील एफडीसीएमच्या यंत्रणेची भूमिका हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सुरुवातीला मजुरांच्या झोपडीसाठी १० ते १५ बांबूची कक्ष क्रमांक १३९ मधून कटाई केल्याचे सांगितल्या गेले. यानंतर लगेच २४ तासातच वन कर्मचाऱ्यांचा सूर बदलला. त्यांच्या वर्तुळात केवळ २०० ते ३०० बांबूची बेकायदा कत्तल करण्यात आल्याची चर्चा रंगू लागली. त्यामुळे वन कर्मचारी अजूनही या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर कन्हाळगाव वनपरिक्षेत्रातील वनाधिकारीसुद्धा प्रकरणातील वेगवेगळे पैलू दिवसागणिक उघड होत असल्याचे पाहून चांगलेच चक्रावले आहेत. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी अजूनपर्यंत या बेकायदेशीर कारनाम्याची चौकशी करण्याचे धाडस केले नाही. शेवटी कन्हाळगाव परिक्षेत्रातील कामे येथील वनाधिकाऱ्यांच्या देखरेख व नियंत्रणाखाली आतापर्यंत होत आली. असताना बांबूतोड प्रकरणातील मार्गदर्शक कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर प्रकार आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी एफडीसीएमच्या यंत्रणेनी केला असावा, असा तर्कसुद्धा लावला जात आहे. दुसरीकडे उद्दिष्टपूर्ती झाली असल्यास घनदाट जंगलात घडलेल्या या प्रकारातून यंत्रणा कर्मचाऱ्यांचे हित साधणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सध्या लिलावात परिसरातील बांबूचा दर ३५ ते ४० रुपये सुरु असल्याची माहिती आहे. हाच बांबू ठेकेदाराला कमी दरात मिळाल्यास ते या बाबूंची केव्हाही उचल करतील. अशावेळी येथील बांबूच्या साठ्याची महिनाभरापासून अजूनपर्यंत उचल केली नसल्याने हा बांबू लिलावात जाणार की, इतर कुठल्या मार्गाने याचा बंदोबस्त लावला जाईल, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (वार्ताहर)