शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त पुरस्कार रकमेच्या खर्चाला फुटले पाय

By admin | Updated: September 8, 2015 00:47 IST

तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून आघाडी शासनाने २००७ पासून सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त ...

काही ठिकाणी रक्कम अखर्चित : पुरस्काराचा निधी वळवला जातो भलतीकडेराजकुमार चुनारकर खडसंगीतत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून आघाडी शासनाने २००७ पासून सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत तंटामुक्त गावांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार रकमेच्या विनियोगाला (खर्चाला) गैरप्रकाराची वाळवी लागली आहे. या रकमेला पाय फुटल्यासारखे खर्च करणे सुरू असल्याचे चित्र पुढे आले आहे. पुरस्कार रकमेच्या खर्चाला ग्रामपंचायतीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन न करताच मनमानी खर्च केला असल्याची आणि काही ग्रामपंचायतीची पुरस्काराची रक्कम सामान्य फंडात अद्याप अखर्र्चित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत तंटामुक्त गावांना लोकसंख्येच्या आधारावर लाखो रुपयांचे पुरस्कार दिले जातात. मात्र या योजनेची अवस्थाच आता जणू ‘आंधळा दळतो अन् कुत्रा पिठ खातो’ अशी झाल्याचे दिसून येत आहे. गाव तंटामुक्त करण्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नियंत्रक व समिती सदस्यांनी योजनेची प्रसिद्धी, प्रचार व गावातील प्राप्त तंटे मिटवण्यापासून ते प्रतिबंधक योजना, विविध उपक्रम राबवून दप्तर लिहून जवळून खर्च करून आपले गाव मुल्यमापनात यशस्वी करीत पुरस्कार प्राप्त केले. संबंधित ग्रामपंचायती मात्र त्यावर कवडीही खर्च करीत नाहीत, ही बाब आश्चर्यकारक आहे.ग्रामपंचायतीने ग्रामसभेतून तंटामुक्त गाव समिती स्थापन करून मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला जातो. १ मे रोजी गाव तंटामुक्त झाल्याचा अहवाल तेवढा पोलीस ठाण्याला पाठवून ग्रामपंचायतीतर्फे सोपस्कर तेवढे पार पाडले जाते. यात काही सन्माननीय गावांचा अपवाद वगळता इतर गावात फक्त सोपस्कार उरकले जातात, हे खरे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी व गाव तंटामुक्त करण्याची सर्वस्वी जवाबदारी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व नियंत्रकासह सदस्य पार पाडतात. मात्र मिळणाऱ्या तंटामुक्त गाव पुरस्काराची रक्कम तंटामुक्त समितीला न मिळता ग्रामपंचायतीला धनादेशाद्वारे देण्यात येते. त्यामुळे पुरस्काराच्या रकमेचे ग्रामपंचायतीचे चांगभलेच होते तर पुरस्काराचा आनंद तंमुस समितीला औट घटकेचा ठरतो. कारण पुरस्काराच्या रकमेचा धनादेश ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडात जमा होऊन ती रक्कम खर्च करण्याचे अधिकार सरपंच, सचिवांना देण्यात आले आहेत. तेथूनच तमुंस पुरस्काराच्या रकमेला वाळवी लागल असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.पुरस्कार रकमेचा विनीयोग करण्यासाठी शासनाने परिशिष्ट ७ (सात) अन्वये मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात पुरस्काराची रक्कम विविध उपक्रमावर खर्च करण्याचे निर्णय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला दिले आहेत. पुरस्काराच्या रकमेचा विनियोग शासन मार्गदर्शक सूचनाप्रमाणे होणे अपेक्षित आहे. मार्गदर्शक सूचनांचे परिशिष्ट ७ चे पत्रक पुरस्कार प्राप्त सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. तालुका जिल्हा समितीने विशेष लक्ष देऊन पुरस्कार रकमेच्या विनियोगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच तंटामुक्त गावांना मिळणारे पुरस्कार तंटामुक्त गाव समित्यांना मिळावे, अशी मागणी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.