शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

जामीन मिळेपर्यंत मद्यपींचा घडला उपवास

By admin | Updated: December 1, 2015 05:22 IST

तेलंगणातून दारू पिऊन येणाऱ्या वेगवेगळ्या पाच लोकांना लाठीच्या ठाणेदारांनी पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल

गोंडपिपरी : तेलंगणातून दारू पिऊन येणाऱ्या वेगवेगळ्या पाच लोकांना लाठीच्या ठाणेदारांनी पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस ठाण्यात नेले. परवा सायंकाळच्या कारवाईनंतर आरोपींना अख्खी रात्र व दुसऱ्या दिवशीही जामीन मिळेपर्यंत नाश्ता तर सोडा, जेवणही देण्यात आले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी न्यायालयाच्या तक्रार पेटीत अर्ज केला. या अर्जातून त्यांनी ठाणेदारांचा अमानवीय व्यवहार न्यायालयाच्या लक्षात आणून दिला.१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र तालुक्यातील तळीराम आपली हौस भागविण्यासाठी लगतच्या तेलंगणातील गावांचा आसरा घेत आहेत. तेलंगणा व महाराष्ट्रातील टोकावरील गावातील नागरिकांचे संबंध असल्याने त्यांचे ये-जा सुरूच असते. आलोच तर थोडीशी घेऊन जावी, असे म्हणून ते घोटभर घेऊन आपल्या गावाकडे परतत असतात. सीमावर्ती भाग लाठी पोलीस स्टेशनअंतर्गत येतो. परवा सायंकाळी तेलंगणातून दारू पिऊन येत असताना खराळपेठ येथील स्वप्नील फुलझेले, संतोष तोरे, वढोलीतील हरिश्चंद्र खरबनकर, सुपगाव येथील राजाराम दुर्गे आणि भंगाराम तळोधीतील अविनाश मराठे यांना पकडण्यात आले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून लाठी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. आरोपीला अटक केल्यानंतरची जबाबदारी ही पोलिसांची असते. मात्र लाठी पोलिसांनी आरोपींना साधा नास्ता तर सोडा रात्रभर उपाशी ठेवले, दुसऱ्या दिवशी सायंकाळी आरोपींना गोंडपिपरीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळपर्यंतही आरोपींना जेवण देण्यात आले नव्हते. कोर्टात २४ तासांपासून उपाशी असलेले आरोपी भूकेने अगदी व्याकूळ झाले होते. मात्र, त्यांच्याकडे पोलिसांकडून पुरते दुर्लक्ष करण्यात आले.दरम्यान, आरोपींची शनिवारी सायंकाळी ७ वाजता जमानत झाली. त्यानंतर या पाचही लोकांनी न्यायालयाच्या तक्रार पेटीत न्यायाधीशांच्या नावाने ठाणेदारांच्या या अमानवीय व्यवहाराची तक्रार केली. आमच्यावर जेवण न देण्याचा जो अन्याय करण्यात आला तसा अन्याय इतर कुठल्याही आरोपींवर होऊ नये यासाठी न्यायाधीशांना अर्जाद्वारे साकडे घालण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)