शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
4
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
5
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
6
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
8
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
9
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
10
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
11
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
12
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
13
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
14
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
15
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
16
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
17
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
18
अनोखा विक्रम! फक्त एका दिवसात १८ लाखांहून अधिक महिलांचा बसमधून मोफत प्रवास
19
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
20
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?

जामीन मिळेपर्यंत मद्यपींचा घडला उपवास

By admin | Updated: December 1, 2015 05:22 IST

तेलंगणातून दारू पिऊन येणाऱ्या वेगवेगळ्या पाच लोकांना लाठीच्या ठाणेदारांनी पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल

गोंडपिपरी : तेलंगणातून दारू पिऊन येणाऱ्या वेगवेगळ्या पाच लोकांना लाठीच्या ठाणेदारांनी पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस ठाण्यात नेले. परवा सायंकाळच्या कारवाईनंतर आरोपींना अख्खी रात्र व दुसऱ्या दिवशीही जामीन मिळेपर्यंत नाश्ता तर सोडा, जेवणही देण्यात आले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी न्यायालयाच्या तक्रार पेटीत अर्ज केला. या अर्जातून त्यांनी ठाणेदारांचा अमानवीय व्यवहार न्यायालयाच्या लक्षात आणून दिला.१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र तालुक्यातील तळीराम आपली हौस भागविण्यासाठी लगतच्या तेलंगणातील गावांचा आसरा घेत आहेत. तेलंगणा व महाराष्ट्रातील टोकावरील गावातील नागरिकांचे संबंध असल्याने त्यांचे ये-जा सुरूच असते. आलोच तर थोडीशी घेऊन जावी, असे म्हणून ते घोटभर घेऊन आपल्या गावाकडे परतत असतात. सीमावर्ती भाग लाठी पोलीस स्टेशनअंतर्गत येतो. परवा सायंकाळी तेलंगणातून दारू पिऊन येत असताना खराळपेठ येथील स्वप्नील फुलझेले, संतोष तोरे, वढोलीतील हरिश्चंद्र खरबनकर, सुपगाव येथील राजाराम दुर्गे आणि भंगाराम तळोधीतील अविनाश मराठे यांना पकडण्यात आले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून लाठी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. आरोपीला अटक केल्यानंतरची जबाबदारी ही पोलिसांची असते. मात्र लाठी पोलिसांनी आरोपींना साधा नास्ता तर सोडा रात्रभर उपाशी ठेवले, दुसऱ्या दिवशी सायंकाळी आरोपींना गोंडपिपरीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळपर्यंतही आरोपींना जेवण देण्यात आले नव्हते. कोर्टात २४ तासांपासून उपाशी असलेले आरोपी भूकेने अगदी व्याकूळ झाले होते. मात्र, त्यांच्याकडे पोलिसांकडून पुरते दुर्लक्ष करण्यात आले.दरम्यान, आरोपींची शनिवारी सायंकाळी ७ वाजता जमानत झाली. त्यानंतर या पाचही लोकांनी न्यायालयाच्या तक्रार पेटीत न्यायाधीशांच्या नावाने ठाणेदारांच्या या अमानवीय व्यवहाराची तक्रार केली. आमच्यावर जेवण न देण्याचा जो अन्याय करण्यात आला तसा अन्याय इतर कुठल्याही आरोपींवर होऊ नये यासाठी न्यायाधीशांना अर्जाद्वारे साकडे घालण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)