शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

शेतातील पऱ्हाला कावडीने पाणी

By admin | Updated: July 11, 2015 01:41 IST

मूल: पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतात धानाचे पेरलेले पऱ्हे करपायला लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागले आहे.

प्रेरणादायी : जुनासुर्ला येथील शेतकऱ्याचा पिके जगविण्याचा प्रयत्नमूल: पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतात धानाचे पेरलेले पऱ्हे करपायला लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागले आहे. मात्र मूल तालुक्यातील मुर्लीधर आत्माराम लोडेल्लीवार या शेतकऱ्याने खचून न जाता गुंड व कावडीने धानाच्या पऱ्ह्यांना पाणीपुरवठा करुन पऱ्हांना जीवनदान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकरी शेतात राब राबतो. कर्ज काढून पिकविलेल्या शेतातून धानाला पाहिजे त्या प्रमाणात भाव दिला जात नाही. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीचे पालन पोषण करण्याचा यक्ष प्रश्न उभा ठाकतो. मात्र पोटाची खडगी भरण्यासाठी व गरजांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतो. मूल तालुक्यात १४ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. पाऊस समाधानकारक आल्यानंतर पेरणी करण्यासाठी धावपळ सुरु झाली. सारी कामे बाजूला सारुन शेतकऱ्यांनी प्रथमत: शेतीमध्ये धानाची पेरणी केली. मात्र धानाच्या पेरणीनंतर वरुणराजाची अवकृपा झाली. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पऱ्हे करपायला लागली आहे. शेतकरी पाऊस येण्याची आतूरतेने वाट बघत असताना मात्र वरुणराजाची अपकृपाच शेतकऱ्यांवर असल्याचे जाणवले. दुबार पेरणी होऊ नये, यासाठी जुनासूर्ला येथील मुर्लीधर आत्माराम लोडेल्लीवार या शेतकऱ्याने मजुरांकरवी जवळ असलेल्या तलावातील पाणी गुंड व कावडीने टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सदर प्रयत्न सफल होईल की नाही, हा नंतरचा प्रश्न असला तरी लोडेल्लीवारसारखे शेतकरी शेतीसाठी प्रयत्नरत असल्याने इतर शेतकऱ्यांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. एकीकडे पावसाची दडी, दुसरीकडे कर्जाचा बोजा तर तिसरीकडे मजुरीने गुंड व कावडीने पाणी टाकण्यासाठी केलेला प्रयत्न यामुळे शेतकरी खचला असला तरी आपली हिंमत सोडली नाही, हेच यावरुन दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)