शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

वाढत्या मजुरीने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: May 30, 2014 23:36 IST

शेत मजुरांच्या मजुरीत यावर्षी मोठी वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत. वाढलेली मजुरी देऊनही मजूर मिळतीलच याची खात्री नाही. परिणामी सध्या खरीपाच्या लागवडीसाठी सुरू

देवाडा(खुर्द) : शेत मजुरांच्या मजुरीत यावर्षी मोठी वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत. वाढलेली मजुरी देऊनही मजूर मिळतीलच याची खात्री नाही. परिणामी सध्या खरीपाच्या लागवडीसाठी सुरू असलेल्या शेती मशागतीच्या कामांवर परिणाम होत आहे. आधीच विविध प्रकोपामुळे शेतकर्‍यांच्या हातात काहीच आले नसतांना खरीपाची तयारी कशी करावी, हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.तालुक्यात महिन्याकाठी विविध योजनेअंतर्गत हजारो क्विंटल धान्य स्वस्त दरात वितरित केले जाते. याचा लाभ परिसरातील हजारो कुटूंबाना मिळते. त्यामुळेच ग्रामीण भागातील ‘सुगी’चे महत्त्व कमी झाले आहे. पूर्वी वर्षभराचे धान्य जमविण्यासाठी सुगीच्या काळात रोख मजुरी सोडून प्रत्येक जण शेतावर राबत होता. मात्र आता स्वस्त दरात धान्य मिळत असल्याने शेतात राबण्यास फारसा मजूर वर्ग तयार होत नाही. शेतकर्‍यांनाही पिकांची काढणी धान्याऐवजी रोख देऊनच करावी लागत आहे.ग्रामीण भागात पूर्वी शेतकरी मजुरांना धान्य स्वरूपातच मोबदला देत होता. त्यामुळे रोख उत्पन्न देणार्‍या पिकासोबतच ज्वारी, उडीद, मुंग, आदी पिके घेतली जात होती. शासनाच्या अंत्योदय व दारिद्रय़ रेषेखालील घटकांसाठीच्या स्वस्त धान्य योजनेमुळे एका कुटूंबाला महिन्याकाठी ३५ ते ४0 किलो धान्य स्वस्त दरात मिळत आहे. अतिशय कमी किंमतीत धान्य मिळत असल्याने मजुरांनी धान्यासाठी मजुरी करणेच सोडून दिले आहे. त्यामुळे ज्वारी, उडीद, मुंग ही पिके सुद्धा नगदी पैसे घेऊन काढावी लागत आहे. परिणामी उत्पन्न कमी व खर्च अधिक झाल्याने शेतकर्‍यांनी ज्वारी व इतर कडधान्याचा पेराच कमी केला. त्याऐवजी सोयाबीन व हरभर्‍याची लागवड मोठय़ा प्रमाणत केली जात आहे. ही दोन्ही पिके अन्य कालावधीत येतात. इतर पिकांच्या तुलनेत कमी मजूर लागतात. निंदणाला पर्याय म्हणून शेतकरी तणनाशकाचा वापर करीत आहे. मात्र याच्या अतिरेकी वापराचा परिणाम थेट जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर होण्याची शक्यता आहे. दुष्परिणाम माहिती असुनही केवळ मजूर मिळत नसल्याने शेतकर्‍यांकडून तणनाशकाचा उपयोग केला जात आहे. गुरांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात गोधनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. परिणामी शेणखताला पर्याय म्हणून रासायनिक खताचा उपयोग वाढला आहे. शेतावर राबण्यास पुरुष कामगार मिळत नाही. सालदाराचे सालही महागले आहे. त्यामुळे सालगडी माणूस भेटणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेती व्यवसायात  डबघाईस आला आहे. (वार्ताहर)