शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या मजुरीने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: May 30, 2014 23:36 IST

शेत मजुरांच्या मजुरीत यावर्षी मोठी वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत. वाढलेली मजुरी देऊनही मजूर मिळतीलच याची खात्री नाही. परिणामी सध्या खरीपाच्या लागवडीसाठी सुरू

देवाडा(खुर्द) : शेत मजुरांच्या मजुरीत यावर्षी मोठी वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत. वाढलेली मजुरी देऊनही मजूर मिळतीलच याची खात्री नाही. परिणामी सध्या खरीपाच्या लागवडीसाठी सुरू असलेल्या शेती मशागतीच्या कामांवर परिणाम होत आहे. आधीच विविध प्रकोपामुळे शेतकर्‍यांच्या हातात काहीच आले नसतांना खरीपाची तयारी कशी करावी, हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.तालुक्यात महिन्याकाठी विविध योजनेअंतर्गत हजारो क्विंटल धान्य स्वस्त दरात वितरित केले जाते. याचा लाभ परिसरातील हजारो कुटूंबाना मिळते. त्यामुळेच ग्रामीण भागातील ‘सुगी’चे महत्त्व कमी झाले आहे. पूर्वी वर्षभराचे धान्य जमविण्यासाठी सुगीच्या काळात रोख मजुरी सोडून प्रत्येक जण शेतावर राबत होता. मात्र आता स्वस्त दरात धान्य मिळत असल्याने शेतात राबण्यास फारसा मजूर वर्ग तयार होत नाही. शेतकर्‍यांनाही पिकांची काढणी धान्याऐवजी रोख देऊनच करावी लागत आहे.ग्रामीण भागात पूर्वी शेतकरी मजुरांना धान्य स्वरूपातच मोबदला देत होता. त्यामुळे रोख उत्पन्न देणार्‍या पिकासोबतच ज्वारी, उडीद, मुंग, आदी पिके घेतली जात होती. शासनाच्या अंत्योदय व दारिद्रय़ रेषेखालील घटकांसाठीच्या स्वस्त धान्य योजनेमुळे एका कुटूंबाला महिन्याकाठी ३५ ते ४0 किलो धान्य स्वस्त दरात मिळत आहे. अतिशय कमी किंमतीत धान्य मिळत असल्याने मजुरांनी धान्यासाठी मजुरी करणेच सोडून दिले आहे. त्यामुळे ज्वारी, उडीद, मुंग ही पिके सुद्धा नगदी पैसे घेऊन काढावी लागत आहे. परिणामी उत्पन्न कमी व खर्च अधिक झाल्याने शेतकर्‍यांनी ज्वारी व इतर कडधान्याचा पेराच कमी केला. त्याऐवजी सोयाबीन व हरभर्‍याची लागवड मोठय़ा प्रमाणत केली जात आहे. ही दोन्ही पिके अन्य कालावधीत येतात. इतर पिकांच्या तुलनेत कमी मजूर लागतात. निंदणाला पर्याय म्हणून शेतकरी तणनाशकाचा वापर करीत आहे. मात्र याच्या अतिरेकी वापराचा परिणाम थेट जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर होण्याची शक्यता आहे. दुष्परिणाम माहिती असुनही केवळ मजूर मिळत नसल्याने शेतकर्‍यांकडून तणनाशकाचा उपयोग केला जात आहे. गुरांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात गोधनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. परिणामी शेणखताला पर्याय म्हणून रासायनिक खताचा उपयोग वाढला आहे. शेतावर राबण्यास पुरुष कामगार मिळत नाही. सालदाराचे सालही महागले आहे. त्यामुळे सालगडी माणूस भेटणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेती व्यवसायात  डबघाईस आला आहे. (वार्ताहर)