शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

शेतकऱ्यांनी बंद केले रस्त्याचे काम

By admin | Updated: April 15, 2017 00:46 IST

पांदण रस्त्यामुळे वडिलोपार्जित शेतजमिनीचे नुकसान होत असल्याने शेतातून जाणारा २ किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडल्याचा प्रकार निलसनी पेडगाव येथे घडला.

निलसनी पेडगाव येथील घटना : पांदण रस्त्यामुळे शेतीची विभागणीचंद्रपूर : पांदण रस्त्यामुळे वडिलोपार्जित शेतजमिनीचे नुकसान होत असल्याने शेतातून जाणारा २ किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडल्याचा प्रकार निलसनी पेडगाव येथे घडला.निलसनी पेडगाव ग्रामपंचायतअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पांदण रस्त्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले. शासनाच्या ध्येय धोरणानुसार या पांदण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, या रस्त्यासाठी शेतकऱ्यांची परवानगी घेण्यात आली नाही. रस्त्याचे कोणतेही सीमांकन न करता बेधडक रस्ता सुरू करण्यात आला. त्यामुळे शेतीचे नुकसान होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि पांदण रस्त्याचे काम बंद पाडले. पांदण रस्ता म्हणून १९७८ पासून शासकीय दप्तरात कोणतीही नोंद नसताना भूमापन क्रमांक २७८ या शेतशिवारातून रस्त्याची निर्मिती करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले. हा पांदण रस्ता निखिल रेप्पलवार, सुधीर मेश्राम, भाकरे अशा अनेक शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेतीतून जात असल्याने शेतीचे दोन तुकड्यांत विभाजन होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा या पांदण रस्त्याला विरोध होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असताना सोबतच हा रस्ता १९२० च्या बंदोबस्तानुसार नोंद असला तरी महसूल रेकॉर्डला याची नोंद नसल्याने हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.दरम्यान, रस्त्याची पाहणी करण्याकरिता महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. रेकॉर्डला नोंद नसल्यामुळे तहसील कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)