शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

शेतकऱ्यांनी बँकांमार्फत कर्ज पुनर्गठन करून घ्यावे

By admin | Updated: May 1, 2016 00:35 IST

ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्चपर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेमार्फत करण्यात येईल.

दीपक म्हैसेकर : बँक प्रतिनिधींची बैठकचंद्रपूर : ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्चपर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेमार्फत करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपले कर्ज पुनर्गठन बँकेमार्फत करुन घ्यावे. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी बँकेमार्फत पीक कर्ज पुरवठा करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी केले. शनिवारी बँकांच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, लिड बँकेचे व्यवस्थापक सुबेसिंग व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्व शेतकऱ्यांना बँकामार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे, अशी भूमिका बँकांनी घ्यावी, असे ते म्हणाले, बँकेची तक्रार येणार नाही, याबाबत खरबदारी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याचा हप्ता दोन टक्के करण्यात आला आहे. पीक विमा करणे आवश्यक असून सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.बँकांनी कर्जाचे पुनर्गठनाचे काम प्राधान्याने करावे, असे ते म्हणाले. बँकांत येणारे सर्व अर्ज घेऊन ठेवावे व त्यावर कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. पुनर्गठन झाले नाही किंवा कर्ज नाकारले, अशी तक्रार येता कामा नये. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले पाहिजे, अशी भूमिका बँकांनी ठेवावी. बँकांनी शेतकऱ्यांना जाणिव जागृती करावी, असे त्यांनी सांगितले. तलाठ्यांचा संप असल्यामुळे कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडे सातबाराचा आग्रह न धरता कर्ज वितरीत करावे. संप संपल्यानंतर कागदाची पुर्तता बँकांनी करुन घ्यावी. ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता नाही, अशाही शेतकऱ्यांनी पीक विमा करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)