शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बँकांमार्फत कर्ज पुनर्गठन करून घ्यावे

By admin | Updated: May 1, 2016 00:35 IST

ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्चपर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेमार्फत करण्यात येईल.

दीपक म्हैसेकर : बँक प्रतिनिधींची बैठकचंद्रपूर : ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्चपर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेमार्फत करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपले कर्ज पुनर्गठन बँकेमार्फत करुन घ्यावे. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी बँकेमार्फत पीक कर्ज पुरवठा करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी केले. शनिवारी बँकांच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, लिड बँकेचे व्यवस्थापक सुबेसिंग व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्व शेतकऱ्यांना बँकामार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे, अशी भूमिका बँकांनी घ्यावी, असे ते म्हणाले, बँकेची तक्रार येणार नाही, याबाबत खरबदारी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याचा हप्ता दोन टक्के करण्यात आला आहे. पीक विमा करणे आवश्यक असून सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.बँकांनी कर्जाचे पुनर्गठनाचे काम प्राधान्याने करावे, असे ते म्हणाले. बँकांत येणारे सर्व अर्ज घेऊन ठेवावे व त्यावर कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. पुनर्गठन झाले नाही किंवा कर्ज नाकारले, अशी तक्रार येता कामा नये. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले पाहिजे, अशी भूमिका बँकांनी ठेवावी. बँकांनी शेतकऱ्यांना जाणिव जागृती करावी, असे त्यांनी सांगितले. तलाठ्यांचा संप असल्यामुळे कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडे सातबाराचा आग्रह न धरता कर्ज वितरीत करावे. संप संपल्यानंतर कागदाची पुर्तता बँकांनी करुन घ्यावी. ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता नाही, अशाही शेतकऱ्यांनी पीक विमा करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)