शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बँकांमार्फत कर्ज पुनर्गठन करून घ्यावे

By admin | Updated: May 1, 2016 00:35 IST

ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्चपर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेमार्फत करण्यात येईल.

दीपक म्हैसेकर : बँक प्रतिनिधींची बैठकचंद्रपूर : ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्चपर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेमार्फत करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपले कर्ज पुनर्गठन बँकेमार्फत करुन घ्यावे. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी बँकेमार्फत पीक कर्ज पुरवठा करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी केले. शनिवारी बँकांच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, लिड बँकेचे व्यवस्थापक सुबेसिंग व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्व शेतकऱ्यांना बँकामार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे, अशी भूमिका बँकांनी घ्यावी, असे ते म्हणाले, बँकेची तक्रार येणार नाही, याबाबत खरबदारी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याचा हप्ता दोन टक्के करण्यात आला आहे. पीक विमा करणे आवश्यक असून सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.बँकांनी कर्जाचे पुनर्गठनाचे काम प्राधान्याने करावे, असे ते म्हणाले. बँकांत येणारे सर्व अर्ज घेऊन ठेवावे व त्यावर कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. पुनर्गठन झाले नाही किंवा कर्ज नाकारले, अशी तक्रार येता कामा नये. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले पाहिजे, अशी भूमिका बँकांनी ठेवावी. बँकांनी शेतकऱ्यांना जाणिव जागृती करावी, असे त्यांनी सांगितले. तलाठ्यांचा संप असल्यामुळे कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडे सातबाराचा आग्रह न धरता कर्ज वितरीत करावे. संप संपल्यानंतर कागदाची पुर्तता बँकांनी करुन घ्यावी. ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता नाही, अशाही शेतकऱ्यांनी पीक विमा करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)