शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी धडकले वनविभागाच्या कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:32 IST

गेवरा : सावली वनपरिक्षेत्रातील वाढत्या वाघांच्या हल्ल्यातील मनुष्यांचे बळी जाण्याच्या घटनांची मालिका दिवसागणिक वाढत आहे. वनक्षेत्राशिवाय आता मनुष्य ...

गेवरा : सावली वनपरिक्षेत्रातील वाढत्या वाघांच्या हल्ल्यातील मनुष्यांचे बळी जाण्याच्या घटनांची मालिका दिवसागणिक वाढत आहे. वनक्षेत्राशिवाय आता मनुष्य वस्ती व शेतशिवारातही वाघांच्या हल्ल्यात नागरिकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे वाघाच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी नागरिकांचे एक शिष्टमंडळ सावली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर धडकले. त्यानंतर तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले.

गेवरा खुर्द गावातील शालीन चापले नामक शेतकरी आपल्या शेतात काम करीत असताना पट्टेदार वाघाने हल्ला चढवून ठार केले, त्यामुळे परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सुरू असलेल्या शेतीच्या धान पिकाच्या निंदनाची मोठ्या प्रमाणात कामे शिल्लक आहेत. परंतु वाघांच्या शेतशिवारातील वाढत्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांच्या शेतातील कामावर मजूर महिला येण्यास धजावत नाहीत. याचा मोठा परिणाम पिकांसह शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर होत आहे. या सर्व परिस्थितीला नियंत्रित करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या सहकार्याशिवाय वनविभाग वाघांच्या बंदोबस्तासाठी पुढे धजावत नसल्याचे समोर येत आहे. एका वर्षात या भागातील तीन जणांना वाघाच्या हल्ल्यात आपले जीव गमवावे लागले आहेत. पाचपेक्षा जास्त लोक जखमी झाले असून शेकडो पाळीव पशूंची हानी झालेली आहे. वनविभागाने त्वरित कायम उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी निवेदनातून दिला आहे.