शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी पणन महासंघाला नाकारले

By admin | Updated: January 8, 2016 01:49 IST

कापसाचे दर आज ना उद्या वाढेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापूस दरवाढीचे कोणतेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले ....

कापूस दरवाढीचा व्यापाऱ्यांना लाभ : खासगी बाजारपेठेत चार हजार ८०० रुपये भाव प्रकाश काळे गोवरीकापसाचे दर आज ना उद्या वाढेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापूस दरवाढीचे कोणतेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री केली. कापूस सरतेशेवटी खासगी बाजारपेठेत कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी चक्क पणन महासंघाला कापूस विकण्यास नकार देत खासगी व्यापाऱ्यांकडे धाव घेतली आहे.कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक आहे. शेतकऱ्यांची वर्षभराची भिस्त कापूस या एकमेव पिकावर अवलंबून असते. यावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारीने कर्ज घेऊन शेती केली. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करुन कशीबशी शेती पिकविली. परंतु यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. शेतीवर केलेला खर्च भरुन निघणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे. शेतीवर अतोनात खर्च करुनही उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर असलेला कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कर्ज घेऊन शेती केल्यानंतर घामाच्या दामासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु झाला. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी कायमची निराशाच आली. हिवाळी अधिवेशनानंतर शेतमालाचे दर वाढतील, या आशेवर शेतकरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरात जागा नसतानाही अडचण सहन करीत कापूस भरुन ठेवला. परंतु त्यानंतर कापूस दरवाढीची आस कायमची संपल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कापसाची कवडीमोल भावात नाईलाजाने विक्री करुन आपली अडचण भागविली. शेतकऱ्यांच्या घरी असलेला कापूस आता संपायला आला असताना खासगी बाजारपेठेत कापसाला प्रति क्विंटल चार हजार ८०० ते आठशे रुपये दर देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी कापूस खरेदी करणाऱ्या पणन महासंघाकडे पाठ फिरविली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगली मागणी असल्याने पाकिस्तान, बांग्लादेश, इंडोनेशिया या देशात भारतीय कापूस निर्यात होत आहे. त्यामुळे खासगी बाजारपेठेत कापसाला सुगीचे दिवस आले आहे. हमीभावावर कापसाची कवडीमोल भावात खरेदी करणाऱ्या पणन महासंघाकडे शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास चक्क नकार दिल्याने सरकारी कापूस संकलन केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट पसरला आहे. जिनिंग ओस पडल्या आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाला चांगला दर मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. त्याचा पूरेपूर फायदा खासगी व्यापारी उचलत आहे. कापसाची वाढती आवक पाहून व्यापारी कापसाचे भाव पाडत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.कापूस दरवाढीचा फायदा कुणाला?शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपत असताना खासगी बाजारात कापसाचे दर वाढले आहे. गरजेपोटी कवडीमोल भावात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री आहे. आज ना उद्या कापूस दरवाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी आर्थिक चणचण असतानाही पोटाला चिमटा घेत दिवस काढले. आता शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपला असून कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे.कापूस विदर्भातील शेतकऱ्यांचे नगदी पिक आहे. मायबाप सरकारने कापसाला तोकडा हमीभाव दिला. त्यामुळे शेतीवर केलेला खर्च भरुन निघाला नाही. आता खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव वाढले आहे. मात्र शेतकऱ्यांजवळ कापूस उरला नसल्याने कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ व्यापाऱ्यांना होणार आहे.- सुनील पिंपळशेंडे, शेतकरी, वनोजा