शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी पणन महासंघाला नाकारले

By admin | Updated: January 8, 2016 01:49 IST

कापसाचे दर आज ना उद्या वाढेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापूस दरवाढीचे कोणतेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले ....

कापूस दरवाढीचा व्यापाऱ्यांना लाभ : खासगी बाजारपेठेत चार हजार ८०० रुपये भाव प्रकाश काळे गोवरीकापसाचे दर आज ना उद्या वाढेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापूस दरवाढीचे कोणतेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री केली. कापूस सरतेशेवटी खासगी बाजारपेठेत कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी चक्क पणन महासंघाला कापूस विकण्यास नकार देत खासगी व्यापाऱ्यांकडे धाव घेतली आहे.कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक आहे. शेतकऱ्यांची वर्षभराची भिस्त कापूस या एकमेव पिकावर अवलंबून असते. यावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारीने कर्ज घेऊन शेती केली. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करुन कशीबशी शेती पिकविली. परंतु यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. शेतीवर केलेला खर्च भरुन निघणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे. शेतीवर अतोनात खर्च करुनही उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर असलेला कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कर्ज घेऊन शेती केल्यानंतर घामाच्या दामासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु झाला. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी कायमची निराशाच आली. हिवाळी अधिवेशनानंतर शेतमालाचे दर वाढतील, या आशेवर शेतकरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरात जागा नसतानाही अडचण सहन करीत कापूस भरुन ठेवला. परंतु त्यानंतर कापूस दरवाढीची आस कायमची संपल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कापसाची कवडीमोल भावात नाईलाजाने विक्री करुन आपली अडचण भागविली. शेतकऱ्यांच्या घरी असलेला कापूस आता संपायला आला असताना खासगी बाजारपेठेत कापसाला प्रति क्विंटल चार हजार ८०० ते आठशे रुपये दर देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी कापूस खरेदी करणाऱ्या पणन महासंघाकडे पाठ फिरविली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगली मागणी असल्याने पाकिस्तान, बांग्लादेश, इंडोनेशिया या देशात भारतीय कापूस निर्यात होत आहे. त्यामुळे खासगी बाजारपेठेत कापसाला सुगीचे दिवस आले आहे. हमीभावावर कापसाची कवडीमोल भावात खरेदी करणाऱ्या पणन महासंघाकडे शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास चक्क नकार दिल्याने सरकारी कापूस संकलन केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट पसरला आहे. जिनिंग ओस पडल्या आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाला चांगला दर मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. त्याचा पूरेपूर फायदा खासगी व्यापारी उचलत आहे. कापसाची वाढती आवक पाहून व्यापारी कापसाचे भाव पाडत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.कापूस दरवाढीचा फायदा कुणाला?शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपत असताना खासगी बाजारात कापसाचे दर वाढले आहे. गरजेपोटी कवडीमोल भावात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री आहे. आज ना उद्या कापूस दरवाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी आर्थिक चणचण असतानाही पोटाला चिमटा घेत दिवस काढले. आता शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपला असून कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे.कापूस विदर्भातील शेतकऱ्यांचे नगदी पिक आहे. मायबाप सरकारने कापसाला तोकडा हमीभाव दिला. त्यामुळे शेतीवर केलेला खर्च भरुन निघाला नाही. आता खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव वाढले आहे. मात्र शेतकऱ्यांजवळ कापूस उरला नसल्याने कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ व्यापाऱ्यांना होणार आहे.- सुनील पिंपळशेंडे, शेतकरी, वनोजा