शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी पणन महासंघाला नाकारले

By admin | Updated: January 8, 2016 01:49 IST

कापसाचे दर आज ना उद्या वाढेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापूस दरवाढीचे कोणतेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले ....

कापूस दरवाढीचा व्यापाऱ्यांना लाभ : खासगी बाजारपेठेत चार हजार ८०० रुपये भाव प्रकाश काळे गोवरीकापसाचे दर आज ना उद्या वाढेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापूस दरवाढीचे कोणतेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री केली. कापूस सरतेशेवटी खासगी बाजारपेठेत कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी चक्क पणन महासंघाला कापूस विकण्यास नकार देत खासगी व्यापाऱ्यांकडे धाव घेतली आहे.कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक आहे. शेतकऱ्यांची वर्षभराची भिस्त कापूस या एकमेव पिकावर अवलंबून असते. यावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारीने कर्ज घेऊन शेती केली. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करुन कशीबशी शेती पिकविली. परंतु यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. शेतीवर केलेला खर्च भरुन निघणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे. शेतीवर अतोनात खर्च करुनही उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर असलेला कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कर्ज घेऊन शेती केल्यानंतर घामाच्या दामासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु झाला. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी कायमची निराशाच आली. हिवाळी अधिवेशनानंतर शेतमालाचे दर वाढतील, या आशेवर शेतकरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरात जागा नसतानाही अडचण सहन करीत कापूस भरुन ठेवला. परंतु त्यानंतर कापूस दरवाढीची आस कायमची संपल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कापसाची कवडीमोल भावात नाईलाजाने विक्री करुन आपली अडचण भागविली. शेतकऱ्यांच्या घरी असलेला कापूस आता संपायला आला असताना खासगी बाजारपेठेत कापसाला प्रति क्विंटल चार हजार ८०० ते आठशे रुपये दर देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी कापूस खरेदी करणाऱ्या पणन महासंघाकडे पाठ फिरविली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगली मागणी असल्याने पाकिस्तान, बांग्लादेश, इंडोनेशिया या देशात भारतीय कापूस निर्यात होत आहे. त्यामुळे खासगी बाजारपेठेत कापसाला सुगीचे दिवस आले आहे. हमीभावावर कापसाची कवडीमोल भावात खरेदी करणाऱ्या पणन महासंघाकडे शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास चक्क नकार दिल्याने सरकारी कापूस संकलन केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट पसरला आहे. जिनिंग ओस पडल्या आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाला चांगला दर मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. त्याचा पूरेपूर फायदा खासगी व्यापारी उचलत आहे. कापसाची वाढती आवक पाहून व्यापारी कापसाचे भाव पाडत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.कापूस दरवाढीचा फायदा कुणाला?शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपत असताना खासगी बाजारात कापसाचे दर वाढले आहे. गरजेपोटी कवडीमोल भावात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री आहे. आज ना उद्या कापूस दरवाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी आर्थिक चणचण असतानाही पोटाला चिमटा घेत दिवस काढले. आता शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपला असून कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे.कापूस विदर्भातील शेतकऱ्यांचे नगदी पिक आहे. मायबाप सरकारने कापसाला तोकडा हमीभाव दिला. त्यामुळे शेतीवर केलेला खर्च भरुन निघाला नाही. आता खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव वाढले आहे. मात्र शेतकऱ्यांजवळ कापूस उरला नसल्याने कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ व्यापाऱ्यांना होणार आहे.- सुनील पिंपळशेंडे, शेतकरी, वनोजा