शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पावसासाठी शेतकऱ्यांचे साकडे

By admin | Updated: July 23, 2015 00:52 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरात पावसाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने..

देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरात पावसाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जन पावसाची डोळे लावून वाट पाहत आहेत. पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे... पाण्यावाचून तळमळते आता सारे गावरे अशी आर्त विनवणी करुन देवाला साकडेही घातले जात आहे.असे असले तरी पंढरीचा पांडुरंग अद्याप तरी शेतकऱ्यांना पावला नाही. आषाढीच्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत असताना शेतकऱ्यांच्या मनात मात्र शेती शिवाराची चिंता होती. पावसाने दडी मारली असल्याने दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. दोन ते चार दिवसांपूर्वी मध्यम पाऊस आला. त्यामुळे अनेकांनी कापूस, सोयाबिन धान पऱ्हे व इतर पिकांची पेरणी केली. पाऊस झाला पण लगेच कडक उन्ह तापू लागले. त्यामुळे देवाडा परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली असल्याने यंदाही दुष्काळचा सामना करावा लागेल, असे दिसत आहे. चांदणे पांघरलेली रात्र मनाला मोहून घेत असली तरी शेतकऱ्यांच्या उरात मात्र धडकी भरत आहे. कधी एकदाचा पाऊस येतो, रान चिंब भिजंते आणि शेतशिवार हिरवेगार होते, याचीच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. राजुरा तालुक्यात देवाडा, पंचायत समिती परिसरातील मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबिन, धान व इतर पिके लावली आहे. परंतु पाऊस यायचे नाव घेत नाही. धानाचे पऱ्हे पाऊस नसल्याने करपायला सुरुवात झाली आहे. गावागावात पावसासाठी देवाकडे साकडे घातले जात आहे. माता मंदिर, राम मंदिर, भुदेवी, लक्ष्मीदेवी शिवमंदिर, गायत्री मंदिर येथे जाऊन देवांना पाण्याने आंघोळी करुन विनवणी केली जात आहे. कुणी तर पूजाअर्चा करत भक्ती गिते, भजन, कीर्तन यांचे आयोजन करीत आहेत. पावसाअभावी पिके करपत असताना कृषी विभाग मात्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत नाही. त्यामुळे देवाडा परिसरातील परिस्थिती अंत्यत वाईट आहे. (वार्ताहर)