शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पावसासाठी शेतकऱ्यांचे साकडे

By admin | Updated: July 23, 2015 00:52 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरात पावसाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने..

देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरात पावसाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जन पावसाची डोळे लावून वाट पाहत आहेत. पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे... पाण्यावाचून तळमळते आता सारे गावरे अशी आर्त विनवणी करुन देवाला साकडेही घातले जात आहे.असे असले तरी पंढरीचा पांडुरंग अद्याप तरी शेतकऱ्यांना पावला नाही. आषाढीच्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत असताना शेतकऱ्यांच्या मनात मात्र शेती शिवाराची चिंता होती. पावसाने दडी मारली असल्याने दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. दोन ते चार दिवसांपूर्वी मध्यम पाऊस आला. त्यामुळे अनेकांनी कापूस, सोयाबिन धान पऱ्हे व इतर पिकांची पेरणी केली. पाऊस झाला पण लगेच कडक उन्ह तापू लागले. त्यामुळे देवाडा परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली असल्याने यंदाही दुष्काळचा सामना करावा लागेल, असे दिसत आहे. चांदणे पांघरलेली रात्र मनाला मोहून घेत असली तरी शेतकऱ्यांच्या उरात मात्र धडकी भरत आहे. कधी एकदाचा पाऊस येतो, रान चिंब भिजंते आणि शेतशिवार हिरवेगार होते, याचीच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. राजुरा तालुक्यात देवाडा, पंचायत समिती परिसरातील मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबिन, धान व इतर पिके लावली आहे. परंतु पाऊस यायचे नाव घेत नाही. धानाचे पऱ्हे पाऊस नसल्याने करपायला सुरुवात झाली आहे. गावागावात पावसासाठी देवाकडे साकडे घातले जात आहे. माता मंदिर, राम मंदिर, भुदेवी, लक्ष्मीदेवी शिवमंदिर, गायत्री मंदिर येथे जाऊन देवांना पाण्याने आंघोळी करुन विनवणी केली जात आहे. कुणी तर पूजाअर्चा करत भक्ती गिते, भजन, कीर्तन यांचे आयोजन करीत आहेत. पावसाअभावी पिके करपत असताना कृषी विभाग मात्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत नाही. त्यामुळे देवाडा परिसरातील परिस्थिती अंत्यत वाईट आहे. (वार्ताहर)