शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

पगारातून बळीराजाच्या पशुधनाचा विमा

By admin | Updated: August 18, 2016 00:34 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी शासन दरबारी रखडलेली आहे. तर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी...

आमदार: पाच लाख रुपयांचा धनादेश विमा कंपनीस सुपूर्दचिमूर : शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी शासन दरबारी रखडलेली आहे. तर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आंदोलनाच्या तयारी सुरू आहे. मात्र या दोन्ही मागण्याला बगल देत आमदार व मंत्र्यांचे पगार वाढविण्यात आल्याने शेतकरी, कर्मचारी तथा सर्वसामान्य नागरिकामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यामध्ये वाढलेला पगार न घेणारे मोजके आमदार निघाले. दरम्यान, आपला वाढलेला पगार स्वीकारला असला तरी चिमूर विधानसभा क्षेत्रातील विधानपरिषदेचे आमदार मितेष भांगडिया व त्यांचे सुपूत्र आमदार किर्तीकुमार भांगडिया या पितापुत्राने शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या पगाराच्या रक्कमेतून चिमूर विधानसभा क्षेत्रातील बळीराजाच्या ढवळ्या- पावळ्याला सुरक्षा कवच देवून बळीराजाला मदतीचा हात देत आपले सामाजिक दायित्व निभावले आहे.एकेकाळी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कना समजला जाणारा शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेती व्यवसाय पूर्णता निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय नेहमी तोट्यात चालला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या म्हणून शेतकरी कर्ज माफीची मागणी सरकारकडे करीत आहे. मात्र सरकार शेतकऱ्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. शेती व्यवसाय काही प्रमाणात पुढे यावा म्हणून शासन अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवित आहे. शेततळे, जलयुक्त शिवार, बांधावर खत, पतपुरवठा या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असला तरी शेतकऱ्यांचा कोणीच वाली नसल्याची भावना शेतकऱ्यात उमटू लागली आहे.समाजासाठी आपलेही काही देणे आहे, या उद्देशाने प्रेरित असलेले चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी युवा शक्ती संघटनेच्या मार्फतीने सुरु केलेली जनसेवा आमदार असतानाही सुरुच ठेवण्यात आल्याची प्रचिती चिमूर क्षेत्रातील नागरिकांना येत आहे. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने व सध्या पेरणीचा हंगाम असल्याने शेतकरी आर्थिक टंचाईत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या पशुचा विमा काढू शकत नाही व अचानक झालेल्या दुर्घटनेतून शेतकरी बाहेर येऊ शकत नाही.तसेच शेती व्यवसायामध्ये बैलजोडीचे महत्व अनन्यसाधारण आहे. बैलाशिवाय शेतकरी शेती करु शकत नाही. अशात दुर्घटना झाल्यास शेतकऱ्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय उपाय नसतो. मात्र अशा अचानक येणाऱ्या आपत्तीतून काही प्रमाणात मदत व्हावी म्हणून शासनाने पशुधन विमा योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही विमा भरुन बैल जोडीचे विमा कवच करता येते.या शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत व्हावी व आपणही समाजाला काही देणे लागतो या मनासिकतेतून चिमूरचे आमदार मितेष भांगडिया व किर्तीकुमार भागंडिया या पितापुत्राने आपल्या आमदारकीच्या पगारातील पाच लाख रुपयातून चिमूर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ढवळ्या- पावळ्या बैलजोडीला सुरक्षा कवच देण्यासाठी रकमेचा धनादेश शहीद स्मृती दिन सोहळा या कार्यक्रमादरम्यान राज्याचे अर्थ व नियोजन तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीचे अधिकारी व पशुविभागाचे अधिकारी यांच्या स्वाधीन केला. आमदार पिता-पुत्राच्या या सामाजिक दायित्वाने चिमूर क्षेत्रातील बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)