शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य न्यायाधीशांना शेतकऱ्यांचे पत्र

By admin | Updated: March 5, 2016 00:49 IST

शेतकरी, शेतमजूर संपूर्ण शेतीवर अवलंबून असून केवळ शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबीयांची उपजीविका भागवितात.

मूल : शेतकरी, शेतमजूर संपूर्ण शेतीवर अवलंबून असून केवळ शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबीयांची उपजीविका भागवितात. परंतु, शासन शेतकऱ्यांना पाहिजे त्या सुविधा देत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाच्या या अन्यायकारक धोरणाविरुद्ध शेतकरी- शेतमजूर कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या समर्थनार्थ मूल तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्त्वात मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठवून न्यायाची अपेक्षा केली आहे.शेतकऱ्याला शेतामध्ये उत्पादन घेत असताना खर्चाच्या बाबतीत अनेक पटीने वाढ झाली आहे. परंतु, आर्थिक उत्पनात वाढ होताना दिसत नाही, नैसर्गिकदृष्ट्या बेभरवशाची, आर्थिकदृष्ट्या तोट्याची व अनिश्चित बाजाराच्या स्थितीमुळे तसेच सध्याच्या सरकारच्या दिशाहीन शेती धोरणामुळे कर्जाचे ओझे वाढत आहे. दररोजच्या जीवनाश्यक गरजाही भागविणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांनी मुख्य न्यायाधीशांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.शेतातील पेरणी ते काढणी पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेंतर्गत होणे आवश्यक आहे. डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागु होणे आवश्यक असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. भविष्यात आत्महत्येचा गंभीर प्रश्न सुटावे यासाठी शेतकरी-शेतमजूर कृती समितीचे संयोजक आमदार शंकर अण्णा धोंडगे, किशोर माथनकर यांनी नागपूर खंडपीठामध्ये जनहित यााचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या समर्थनार्थ मूल तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोष्ट कार्यालयात जाऊन पत्राच्या माध्यमातून मुख्य न्यायाधीशांना घटनात्मक अधिकाराचा वापर करुन न्याय देण्याची विनंती केली आहे. यावेळी सुमित समर्थ, मंगेश पोटवार, संजय येरोजवार, वर्षा लोनबले, ममता गोजे, विकास गेडाम, महेश कटकमवार, गजापुरे, गुरुनुले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)