शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

मुख्य न्यायाधीशांना शेतकऱ्यांचे पत्र

By admin | Updated: March 5, 2016 00:49 IST

शेतकरी, शेतमजूर संपूर्ण शेतीवर अवलंबून असून केवळ शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबीयांची उपजीविका भागवितात.

मूल : शेतकरी, शेतमजूर संपूर्ण शेतीवर अवलंबून असून केवळ शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबीयांची उपजीविका भागवितात. परंतु, शासन शेतकऱ्यांना पाहिजे त्या सुविधा देत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाच्या या अन्यायकारक धोरणाविरुद्ध शेतकरी- शेतमजूर कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या समर्थनार्थ मूल तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्त्वात मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठवून न्यायाची अपेक्षा केली आहे.शेतकऱ्याला शेतामध्ये उत्पादन घेत असताना खर्चाच्या बाबतीत अनेक पटीने वाढ झाली आहे. परंतु, आर्थिक उत्पनात वाढ होताना दिसत नाही, नैसर्गिकदृष्ट्या बेभरवशाची, आर्थिकदृष्ट्या तोट्याची व अनिश्चित बाजाराच्या स्थितीमुळे तसेच सध्याच्या सरकारच्या दिशाहीन शेती धोरणामुळे कर्जाचे ओझे वाढत आहे. दररोजच्या जीवनाश्यक गरजाही भागविणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांनी मुख्य न्यायाधीशांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.शेतातील पेरणी ते काढणी पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेंतर्गत होणे आवश्यक आहे. डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागु होणे आवश्यक असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. भविष्यात आत्महत्येचा गंभीर प्रश्न सुटावे यासाठी शेतकरी-शेतमजूर कृती समितीचे संयोजक आमदार शंकर अण्णा धोंडगे, किशोर माथनकर यांनी नागपूर खंडपीठामध्ये जनहित यााचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या समर्थनार्थ मूल तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोष्ट कार्यालयात जाऊन पत्राच्या माध्यमातून मुख्य न्यायाधीशांना घटनात्मक अधिकाराचा वापर करुन न्याय देण्याची विनंती केली आहे. यावेळी सुमित समर्थ, मंगेश पोटवार, संजय येरोजवार, वर्षा लोनबले, ममता गोजे, विकास गेडाम, महेश कटकमवार, गजापुरे, गुरुनुले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)