शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

शेतकऱ्यांनी जाणून घेतली आधुनिक शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:11 IST

पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील गोरजा गावाच्या स्वयंप्रेरणेतून पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा नुकताच पार पडला़

ठळक मुद्देअभ्यास दौरा : मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील गोरजा गावाच्या स्वयंप्रेरणेतून पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा नुकताच पार पडला़ या दौऱ्यात शेतकऱ्यांनी आदर्श गाव, कृषी विद्यापीठ, सहकारी शेती, पाणलोट प्रकल्पांची पाहणी करून आधुनिक शेतीचे धडे घेतले़प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष गिरडे, सहसमन्वयक प्रा. किरणकुमार मनुरे यांनी जबाबदारी स्वीकारली होती़ अभ्यास दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेती, बचत गटातील पुरुष, महिला, युवक, छत्रपती शिवाजी महाराज पाणी वाटप संस्था गोरजा, अध्यक्ष सचिव, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांची माहिती शेतकऱ्यांनी जाणून घेतली़राळेगाव सिद्धी, आदर्श गाव पाटोदा, सहकारी शेती करणारी इंगेगाव, जिल्हा परळी, परभणी कृषी विद्यापीठ व राहुरी कृषी विद्यापीठांना भेट दिली़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विकासाच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली़ गावाच्या हितासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, यावर शेतकºयांनी संवाद साधला़ राळेगाव सिद्धी गावाची माहिती घेतल्यानंतर अण्णांच्या भेटीसाठी आतुर असणारे व त्यांचे मार्गदर्शन लाभेल की नाही यावर सर्वांचा प्रश्न होता. कारण अण्णांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे ते भेटणार नाही, असे वाटले होते. पण चंद्रपूर जिल्ह्यातून आदर्श गाव संकल्पनेतून स्वयंप्रेरणा घेवून शेतकरी आल्याचे कळताच अण्णांनी भेटीचा वेळ दिला़ शेतकरी व महिलांशी दिलखुलास चर्चा केली़ शेतीकरिता पाण्याचा योग्य वापर करावा़ महिलांनी संघटित होवून व्यसनमुक्त गाव, नियमित ग्रामसभा तसेच शुद्ध आचारविचार, शुद्ध चरित्र, त्यागावर आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा़, असे मत अण्णा हजारे यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले़ स्वत:सोबतच गावाचा विचार करुन जात व धर्मभाव न पाळता एकत्र यावे, असा मुलमंत्र जिल्ह्यातील शेतकºयांना दिला़ गावाच्या विकासाकरिता हा अभ्यास दौरा प्रेरणादायी असून शेती आणि गावात विविध प्रकल्प राबविताना अंमलात आणू, असा संकल्प शेतकºयांनी केला़