शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी जाणून घेतली आधुनिक शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:11 IST

पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील गोरजा गावाच्या स्वयंप्रेरणेतून पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा नुकताच पार पडला़

ठळक मुद्देअभ्यास दौरा : मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील गोरजा गावाच्या स्वयंप्रेरणेतून पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा नुकताच पार पडला़ या दौऱ्यात शेतकऱ्यांनी आदर्श गाव, कृषी विद्यापीठ, सहकारी शेती, पाणलोट प्रकल्पांची पाहणी करून आधुनिक शेतीचे धडे घेतले़प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष गिरडे, सहसमन्वयक प्रा. किरणकुमार मनुरे यांनी जबाबदारी स्वीकारली होती़ अभ्यास दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेती, बचत गटातील पुरुष, महिला, युवक, छत्रपती शिवाजी महाराज पाणी वाटप संस्था गोरजा, अध्यक्ष सचिव, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांची माहिती शेतकऱ्यांनी जाणून घेतली़राळेगाव सिद्धी, आदर्श गाव पाटोदा, सहकारी शेती करणारी इंगेगाव, जिल्हा परळी, परभणी कृषी विद्यापीठ व राहुरी कृषी विद्यापीठांना भेट दिली़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विकासाच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली़ गावाच्या हितासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, यावर शेतकºयांनी संवाद साधला़ राळेगाव सिद्धी गावाची माहिती घेतल्यानंतर अण्णांच्या भेटीसाठी आतुर असणारे व त्यांचे मार्गदर्शन लाभेल की नाही यावर सर्वांचा प्रश्न होता. कारण अण्णांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे ते भेटणार नाही, असे वाटले होते. पण चंद्रपूर जिल्ह्यातून आदर्श गाव संकल्पनेतून स्वयंप्रेरणा घेवून शेतकरी आल्याचे कळताच अण्णांनी भेटीचा वेळ दिला़ शेतकरी व महिलांशी दिलखुलास चर्चा केली़ शेतीकरिता पाण्याचा योग्य वापर करावा़ महिलांनी संघटित होवून व्यसनमुक्त गाव, नियमित ग्रामसभा तसेच शुद्ध आचारविचार, शुद्ध चरित्र, त्यागावर आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा़, असे मत अण्णा हजारे यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले़ स्वत:सोबतच गावाचा विचार करुन जात व धर्मभाव न पाळता एकत्र यावे, असा मुलमंत्र जिल्ह्यातील शेतकºयांना दिला़ गावाच्या विकासाकरिता हा अभ्यास दौरा प्रेरणादायी असून शेती आणि गावात विविध प्रकल्प राबविताना अंमलात आणू, असा संकल्प शेतकºयांनी केला़