शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

शेतकऱ्यांचा उत्पन्न-उत्पादन खर्चाचा मेळ बसेना

By admin | Updated: November 13, 2016 00:40 IST

दिवाळीच्या तोंडावर काही भागातील शेतकऱ्यांनी कापूस वेचनीला सुरूवात केली.

कापूस उत्पादकांची व्यथा कापसाला हवा किमान सात हजार भावराजकुमार चुनारकर चिमूरदिवाळीच्या तोंडावर काही भागातील शेतकऱ्यांनी कापूस वेचनीला सुरूवात केली. कारण कापूस विकून दिवाळी साजरी करण्याच्या आशेने ग्रामीण भागात कापूस वेचाईला वेग आला होता. किलोभर कापूस वेचण्यासाठी मजुराला ४ ते ५ रुपये दर मजुरांना द्यावा लागत आहे. एक क्विंटल कापूस वेचण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल पाचशे रुपये खर्च होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न आणि उत्पादनाचा खर्च याचा मेळ बसविणे कठीण झाले आहे.दिवाळी साजरी करण्यासह मुलीच्या पहिल्या दिवाळीचे माहेरपण जपण्यासाठी शेतकऱ्यांना कापूस निघाच्या अगोदर काही सामान बाजारातून उधारीवर घेवून दिवाळी साजरी केली. पण आता दुकानदाराचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना घरातील कापूस बेभाव विकण्याशिवाय पर्याय नाही. खासगी व्यापाऱ्यांना अल्प दराने कापूस विकून व्यापाऱ्यांची उधारी द्यावी लागत आहे.सध्या बाजारात कापसाला प्रति क्विंटल ४५०० ते ४६०० रुपये भाव मिळत आहे. त्यातच पाच रुपये किलोप्रमाणे वेचणी आणि तत्पुर्वी झालेला खत, फवारणी, आणि लागवडीसाठी लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. चार वर्षाच्या सततच्या दुष्काळानंतर यंदा पावसाने संततधार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. खरीपाने भरघोष उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पैशाची जुळवा- जुळव करून पिकांची लागवड केली. सोयाबिनने घात केला असला तरी शेतकऱ्यांच्या आशा पांढऱ्या सोन्याकडे लागल्या होत्या. यंदा अस्मानी संकटाने काहीसे तारले असले तरी सुल्तानी कारभाराने शेतकऱ्यांत नाराजी आहे. मात्र दराचा विचार करता कपाशीचे पीक मारक ठरले आहे. लागवडीचा खर्च अधिक असल्याने कापसाला प्रति क्विंटल ७ हजार रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.शेती मशागतीपासून लागवड बियाणे, फवारणीचा खर्च जवळपास एकरी १८ हजारांवर पोहोचतो. कापूस वेचनीचाही दर प्रति किलो चार ते पाच रुपये आहे. त्यामुळे कापसाला सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाणे आवश्यक आहे.- बबलू पाटील थुटेशेतकरी, बोथली