शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शेतकऱ्यांचा उत्पन्न-उत्पादन खर्चाचा मेळ बसेना

By admin | Updated: November 13, 2016 00:40 IST

दिवाळीच्या तोंडावर काही भागातील शेतकऱ्यांनी कापूस वेचनीला सुरूवात केली.

कापूस उत्पादकांची व्यथा कापसाला हवा किमान सात हजार भावराजकुमार चुनारकर चिमूरदिवाळीच्या तोंडावर काही भागातील शेतकऱ्यांनी कापूस वेचनीला सुरूवात केली. कारण कापूस विकून दिवाळी साजरी करण्याच्या आशेने ग्रामीण भागात कापूस वेचाईला वेग आला होता. किलोभर कापूस वेचण्यासाठी मजुराला ४ ते ५ रुपये दर मजुरांना द्यावा लागत आहे. एक क्विंटल कापूस वेचण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल पाचशे रुपये खर्च होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न आणि उत्पादनाचा खर्च याचा मेळ बसविणे कठीण झाले आहे.दिवाळी साजरी करण्यासह मुलीच्या पहिल्या दिवाळीचे माहेरपण जपण्यासाठी शेतकऱ्यांना कापूस निघाच्या अगोदर काही सामान बाजारातून उधारीवर घेवून दिवाळी साजरी केली. पण आता दुकानदाराचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना घरातील कापूस बेभाव विकण्याशिवाय पर्याय नाही. खासगी व्यापाऱ्यांना अल्प दराने कापूस विकून व्यापाऱ्यांची उधारी द्यावी लागत आहे.सध्या बाजारात कापसाला प्रति क्विंटल ४५०० ते ४६०० रुपये भाव मिळत आहे. त्यातच पाच रुपये किलोप्रमाणे वेचणी आणि तत्पुर्वी झालेला खत, फवारणी, आणि लागवडीसाठी लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. चार वर्षाच्या सततच्या दुष्काळानंतर यंदा पावसाने संततधार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. खरीपाने भरघोष उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पैशाची जुळवा- जुळव करून पिकांची लागवड केली. सोयाबिनने घात केला असला तरी शेतकऱ्यांच्या आशा पांढऱ्या सोन्याकडे लागल्या होत्या. यंदा अस्मानी संकटाने काहीसे तारले असले तरी सुल्तानी कारभाराने शेतकऱ्यांत नाराजी आहे. मात्र दराचा विचार करता कपाशीचे पीक मारक ठरले आहे. लागवडीचा खर्च अधिक असल्याने कापसाला प्रति क्विंटल ७ हजार रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.शेती मशागतीपासून लागवड बियाणे, फवारणीचा खर्च जवळपास एकरी १८ हजारांवर पोहोचतो. कापूस वेचनीचाही दर प्रति किलो चार ते पाच रुपये आहे. त्यामुळे कापसाला सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाणे आवश्यक आहे.- बबलू पाटील थुटेशेतकरी, बोथली